महाराष्ट्र-जपान मैत्री नव्या उंचीवर! वाकायामा राज्यपालांची मुख्यमंत्र्यांशी भेट; 'या' महत्वाच्या मुद्यावर चर्चा (फोटो सौजन्य: एक्स अकाउंट /@ians_india)
हे देखील वाचा : “रितू तावडेंनी मुंबईकरांसाठी आक्रमक…”; BMC च्या सभागृहात काय म्हणाले CM फडणवीस?
जपानच्या वाकायामा प्रांताचे राज्यपाल मियाझाकी इजुमी यांनी जपानच्या शिष्टमंडळासह हॉटेल ताजमहल येथे फडणवीस यांची भेट घेतली, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, जपानचे महावाणिज्यदूत यागी कोजी, वाकायामा विधानसभेचे उपाध्यक्ष अकिझुकी फुमिनारी आदी यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक, व्यावसायिक, सांस्कृतिक आणि मनोरंजन व्यवसायाची राजधानी आहे. ‘सिस्टर स्टेट’ असलेल्या महाराष्ट्राचे आणि वाकायामा प्रांताचे अनेक वर्षांपासून मैत्रीचे संबंध आहेत, असे ते म्हणाले.
अजिंठा परिसरात पर्यटकांसाठी सुविधा
वाकायामा प्रांताच्या सहकार्याने जपानी पर्यटकाना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून अजिंठा परिसरातही जपानी पर्यटकांसाठी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. दोन वेळा झालेल्या जपान दौऱ्यादरम्यान वाकायामा आणि कोयासन येथे भेट दिल्याच्या आठवणी सांगून कोयासन विद्यापीठात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हे दोन्ही देशांतील मैत्रीचे प्रतीक असल्याचे मुख्यमंत्र्यानी नमूद केले.
महाराष्ट्र-वाकायामा संबंध नव्या उंचीवर नेणार : राज्यपाल मियाझाकी इजुमी
महाराष्ट्र आणि वाकायाना दरम्यान कराराचे २०२८ मध्ये नूतनीकरण करून नवनवीन क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा मानस वाकायामाचे राज्यपाल नियाझाकी इजुमी यांनी व्यक्त केला. ‘वाळावामा हे जपानमधील महाराष्ट्राचे प्रवेशद्वार आहे’ असे सांगून महाराष्ट्र-वाकायामा मधील संबंध नव्या उंचीवर जातील, असे त्यांनी सांगितले, नागपूर येथे बुद्ध पुतळ्याची प्रतिकृती उभारण्याच्या प्रस्तावालाही प्रतिसाद दिला.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.
जालन्यात सरकारी डेटाची चोरी
जालना, जालन्यात बनावट : वेबसाईटद्वारे सरकारी डेटा चोरी होत आहे. याप्रकरणी जालना पोलिसांनी आतापर्यंत विविध देशातून पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. काही दिवसांपूर्वी जालन्यात आरटीओ कार्यालयाच्या प्रक्रियेला बायपास करून ८० रुपयांत बनावट वेबसाईटद्वारे लर्निंग लायसन्स दिले जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी जालना सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत सखोल तपास केला. या तपासात पोलिसांसमोर धक्कादायक बाब उघडकीस आली. या तपासात आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, गॅस कार्डसह आरटीओ कार्यालयातील डेटा चोरीला गेला आहे.






