• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • We Are What We Are Because Of Babasaheb Ambedkar Says Ceo Manisha Awhale Nrka

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही आहोत; सीईओ मनिषा आव्हाळे यांचं विधान

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत. सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 14, 2024 | 03:04 PM
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही आहोत; सीईओ मनिषा आव्हाळे यांचं विधान
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही आहोत. सामाजिक न्याय देण्यासाठी अहोरात्र परिश्रम केले. बाबासाहेब यांचे विचार आत्मसात करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती समारंभा प्रसंगी आव्हाळे बोलत होत्या.

१० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात समता पंधरवाड्याचे आयोजन
करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटना, मराठा सेवा संघ यांचे संयुक्त विद्यमाने या व्याख्यान आणि भीमगीतांचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमप्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी अभिवादन केले.

व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पारसे, कास्ट्राईब अध्यक्ष अरूण क्षिरसागर, मराठा सेवा संघ अध्यक्ष अविनाश गोडसे, लिपीकवर्गीय संघटनेचे राजेश देशपांडे, युनियनचे विवेक लिंगराज, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होती.

बाबासाहेब आंबेडकर यांनी गरिबांच्या विकासासाठी काम केले, असे सांगून सीईओ मनिषा आव्हाळे पुढे म्हणाल्या, माझे स्पर्धा परीक्षांचा पाया हा बाबासाहेबांचा विचाराचा आहे. या महामानवांपुढे आपले काम खुप छोटे आहे. बाबासाहेब यांचे वाचन व लेखन खूप होते. त्यांच्या विचाराचे पुढे आपण खुप नगन्य आहोत. अनेक पुस्तकांचे मी वाचन केले. बाबासाहेब यांचे फोटोला हार घालून अभिवादन करण्याबरोबरच त्यांचे विचार देखील आत्मसात करा.

जिल्हा परिषद विकासाचे केंद्र आहे. आपणास दिलेले अधिकार शेवटच्या घटकासाठी वापरणे आवश्यक आहे, असेही सीईओ आव्हाळे यांनी सांगून आपला जीवनपट सांगून कवी नामदेव ढसाळ यांचे प्रेरणादायी कविता ऐकवली.

प्रास्तविक समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले. आर्थिक शोषणाची भुमिका प्राब्लेम ऑफ रूपीजमध्ये मांडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेस उपकर लागू करणेची भूमिका शोधनिबंधात मांडली.

या प्रसंगी बोलताना व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला जागृत करण्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र काढले. त्यांचा हरिजन या शब्दास विरोध होता. बहिष्कृत समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले. त्यानंतर स्वातंत्र्याचा लढा ही सर्वांनी घेऊन लढावे लागेल म्हणून त्यांनी जनता हे वृत्तपत्र काढले. जगातील सर्व राज्य घटनांचा अभ्यास करून भारताची लिखित स्वरूपात राज्यघटना आहे. संकुचित विचार बाबासाहेबांनी कधी केला नाही. एक ही क्षेत्र असे नाही ज्याचा बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध आला नाही.

पूरनियंत्रणाच्या बाबतीत पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी त्यांनी नदीजोड प्रकल्प मांडला. असेही व्याख्याते डॉ. रविंद्र चिंचोळकर यांनी व्यक्त केले. परिवर्तनाचे काम बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. परिवर्तनाचे स्वप्न त्यांनी पाहिले. असेही चिचोळकर यांनी सांगितले. समाज कल्याण विभागाचे विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, विस्तार अधिकारी संदिप खरबस, सच्चीदानंद बांगर, सहाय्यक लेखाधिकारी सावळा काळे, यांनी परिश्रम घेतले.

स्वानंद म्युझिकल ग्रुपने भीमगीत गायन केले. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर चा वतीने भीम गिताचे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सचिन चव्हाण, दिनेश बनसोडे, यांच्यासह मान्यवरांना पुस्तक भेट देणेत आले. कास्ट्राईब संघटनेचे वतीने मिठाईचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी गुरव यांनी केले.

Web Title: We are what we are because of babasaheb ambedkar says ceo manisha awhale nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2024 | 03:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Solapur News
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

S-400 Strategic Shield India : रशियाकडून भारताला ‘सुदर्शन चक्र’ भेट? पुतिन दूताची मोठी घोषणा, S-400 ठरणार विलक्षण निर्णय

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

‘इतकं सोप्पं आहे का…?’, ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर जुई गडकरीची वाईट अवस्था, म्हणाली…

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Lok Sabha MP Criminal Record: २५१ खासदारांचे सदस्यत्व धोक्यात? कोणत्या पक्षाचे खासदार जास्त अडचणीत

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

Ration Card: मोदी सरकारची मोठी करावाई सुरु, १.१७ कोटी लोकांची रेशन कार्ड होणार रद्द; वाचा सविस्तर

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.