Kokan Railway : रेल्वे स्टेशनचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी लवकरच पुढाकार घेऊ, खासदार अमोल कोल्हे यांचं आश्वासन
संजय वालावलकर , सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या १० रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याबाबत तसंच जाणीवपूर्वक प्रवाशांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं, गाड्या थांबे , तिकीट कोठा , रस्ते आणि स्टेशन प्लॅटफॉर्म समस्यांबाबतचा मुद्दा केंद्र सरकारच्या स्थायी समिती सभेत मांडण्यात आला. नवीनस्टॅन्डीग कमीटीच्या पहिल्या सभेत सिंधुदूर्ग जिल्हयातील १० ही रेल्वे स्टेशनचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असं खासदार अमोल कोल्हे यांनी आश्वासन दिले .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण, वैभववाडी, आचिर्णे, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडूरा यासर्व १० रेल्वे स्टेशनवरील प्रवाश्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मागील ३ वर्षापासून कार्यरत आहोत. परंतु सीएमडी बेलापुर आणि आरआरएम रत्नागिरी यांच्याशी सतत पत्रव्यवहार करुनही अपेक्षित बदल होताना दिसला नाही. या प्रमुख स्टेशनमध्ये सिंधुदुर्ग हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण आहे. सिंधुदुर्ग स्टेशनवर यापूर्वी तिकीट कोटा सिस्टिम होती ती पुन्हा सुरु करावी किंवा पी आर एस सिस्टिम सुरु करावी. नेहमी जाता येता सिंधुदुर्ग स्टेशनवर २०दिवस क्रॉसिंग होणारी नेत्रावती लोकमान्य टिळक एक्सप्रेस , तसेच जनशताब्दी या गाड्यांना थांबा मिळावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही न थांबता जाणाऱ्या जलद गाड्यांमध्ये मरुसागर, जामनगर तसेच एन झेड एम अर्नाकुलमएक्सप्रेस यासह प्रमुख गाड्यांना सिंधुदुर्ग स्टेशन वर थांबा मिळावा. तसेच वैभववाडी पीबी आर कोचीवली , जी एल एम बी हमसफर एक्सप्रेस , कणकवली स्टेशन ला गोवा संपर्क क्रांति , जामटेन एक्सप्रेस , याचप्रमाणे कुडाळ स्टेशनला केरळाक्रांती , एलटीटी , इआरएस , दुरंतो आणि सावंतवाडी येथे वायएन आर के कोचीवली, एनझेडएम दुरंतो एक्सप्रेस या रेल्वेना थांबा मिळावा.
हेही वाचा- नेवासा येथे जागतिक दर्जाचा संत ज्ञानेश्वर सृष्टी प्रकल्प,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हा मुख्यालय ठिकाण असल्याने जिल्हाधिकारी, सह प्रमुख अधिकारी न्यायाधीश व अन्य कर्मचारी अधिकारी प्रवाशांना सोयीचे होणार आहे. पर्यटन आणि मेडिकल टुरिझमकडे केंद्र शासनाने लक्ष दिलं आहे. येणारे पर्यटकांना सोयी सुविधा साठी सिंधुदुर्ग स्टेशन महत्वाचे असून या स्टेशनजवळ एस एस पी एम हॉस्पिटल, शासकीय मेडिकल कॉलेज, (सिंधुदुर्ग) याशिवाय कृषीकॉलेज, लॉ कॉलेज मध्ये येणारे परजिल्ह्यातील विद्यार्थी यांना थांबा सोयीचा ठरणार आहे. तसेच टुरिझम इकॉनॉमी दृष्टीने, मालवण पर्यटन ठिकाणच्या दृष्टीने सिंधुदुर्ग स्टेशन महत्वाचे आहे.याचबरोबर दिवा रत्नागिरी मडगाव ही लोकल गाडी कोरोना नंतर बंद झाली आहे. तिची रत्नागिरी येथून रात्री २ ऐवजी ४वाजता सुटल्यास वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी, मडुरा येथून नियमित गोव्यात रोजी रोटी, आरोग्य सेवा व भाजी पाला विक्री साठी जाणाऱ्या प्रवाशांना सोयीचे ठरणार आहे. तरी या बाबत विचार व्हावा.अशी मागणी केली आहे .