(फोटो सौजन्य - अकाउंट)
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी हा अनेकदा चर्चेत असतो. आजकाल तो जामनगर ते द्वारका या १४० किलोमीटर चालण्याच्या प्रवासामुळे चर्चेत आहे. मात्र, या प्रवासादरम्यान एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. खरं तर, ट्रिप दरम्यानच, अनंत अंबानीने दुप्पट किंमत देऊन सुमारे २५० कोंबड्या खरेदी केल्या आहेत. यामागील कारण काय आहे आणि त्याने या कोंबड्या का खरेदी केल्या हे आपण जाणून घेणार आहोत.
कोंबड्यांना वाचवण्यासाठी अनोखा उपक्रम
खरंतर, अनंत अंबानीने जामनगर ते द्वारका या १४० किलोमीटर प्रवास करताना पाहिले की एका ट्रकमधून २५० कोंबड्या कत्तलखान्यात नेल्या जात होत्या. त्याने ताबडतोब ते वाहन थांबवले आणि ड्रायव्हरशी बोलल्यानंतर दुप्पट किंमत देऊन कोंबड्या विकत घेतल्या आहे. यानंतर तो म्हणाला की आता आपण त्यांना वाढवू. हातात कोंबडी घेऊन पुढे जाताना अनंतने “जय द्वारकाधीश” असा नाराही दिला.
Manoj Kumar: मनोज कुमार यांना ‘या’ गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, रोगाची लक्षणे काय?
धार्मिक स्थळांवर घेतले आशीर्वाद
भास्करच्या वृत्तानुसार, अनंतच्या प्रवासाच्या पाचव्या दिवशी, तो वडत्रा गावाजवळील विश्वनाथ वेद संस्कृत पाठशाळेत पोहोचला, जिथे त्याने संस्थापक मगनभाई राज्यगुरू यांचे चरणस्पर्श केले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. यानंतर, खांभालिया येथील फुलिया हनुमान मंदिरात भरतदास बापूंनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. बापूंनी अनंतला भगवान द्वारकाधीशांचा एक फोटो भेट दिला, जो त्याने आपल्या हातांनी घेतला आणि आशीर्वाद म्हणून स्वीकारला.
This video of Anant Ambani will win your heart. While going from Jamnagar to Dwarka, Anant saw chickens inside a tempo which were being taken for slaughter. Anant Ambani told his people to give their money to the owner, and now we will raise them.❤️🚩❤️ pic.twitter.com/iwkA7bY1CI
— Baba Banaras™ (@RealBababanaras) April 1, 2025
१० एप्रिल रोजी द्वारकेत वाढदिवस साजरा करणार
अनंत अंबानीने २८ मार्च रोजी जामनगरमधील मोती खावडी येथून आपला प्रवास सुरू केला. तसेच तो १० एप्रिल रोजी द्वारका येथे त्यांचा ३० वा वाढदिवस साजरा करणार आहे. लोकांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून ते रात्री प्रवास करत आहेत. माध्यमांशी बोलताना अनंत म्हणाला की, “कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मी नेहमीच भगवान द्वारकाधीशांचे स्मरण करतो. तरुणांना माझा संदेश आहे की देवावर श्रद्धा ठेवा, कारण जिथे देव आहे तिथे काळजी करण्याची काहीच गरज नाही.”
मनोज कुमारने किती संपत्ती सोडली मागे? अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीतून केली एवढी कमाई!
वन्यजीव संवर्धनासाठी समर्पित
अनंत अंबानी त्यांच्या “वंतारा” प्रकल्पाद्वारे वन्यजीव संवर्धनात सक्रिय आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच त्यांना प्राणी कल्याणासाठी “प्राणि मित्र राष्ट्रीय पुरस्कार” देऊन सन्मानित केले आहे. वांतारा येथे २००० हून अधिक प्रजातींमधील १.५ लाखांहून अधिक प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे.