(फोटो सौजन्य - Instagram)
स्वतःच्या घरी परत परतणे हे प्रत्येकासाठी सुखद असते असे नाही. तसेच वाड्यातील काही दरवाजे न उघडणेच बरे असतात. ZEE5 अशीच एक भयानक कथा प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. ‘अंधार माया’ या पहिल्या मराठी हॉरर ओरिजनल सीरीजचा हादरवून टाकणारा थरारक ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हालाचकित करणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते भीमराव मुडे यांनी दिग्दर्शित केलेली ही वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर ‘अंधार माया’ ची शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी एरिकॉन टेलिफिल्म्सअंतर्गत निर्मिती केली आहे. या मालिकेची कथा आणि संवाद प्रल्हाद कुडतरकर यांनी लिहिले आहे.
‘अंधार माया’ ची पटकथा कपिल भोपटकर यांनी लिहिली आहे. या मालिकेमध्ये दोनदा राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते किशोर कदम हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच त्यांना पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. एका कुटुंबाच्या भूतकाळाने ग्रासलेल्या पूर्वजांच्या घरात घडणारी ‘अंधार माया’ची गोष्ट कोकणात लपलेली भीती आणि घाबरवणाऱ्या एका शोधाची आहे. रहस्य, गूढरम्य वातावरण आणि भावनांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या सीरीजचे प्रीमियर ३० मे रोजी ZEE5 वर होणार आहे.
हर्षवर्धन राणेंच्या नावाने चाहत्यांची फसवणूक, अभिनेत्याने दिला सावधानतेचा इशारा!
‘अंधार माया’ ही मालिका कोकणातल्या गूढ, काळोख्या, पछाडलेल्या आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथेसारखी आहे. या मालिकेत एकेकाळी अभिमानाचा विषय असलेला खातू कुटुंबाच्या पूर्वजांचा वाडा सगळ्यांना एका अंतिम विधीसाठी परत आणतो, मात्र या वाड्याच्या मनात काहीतरी वेगळंच असतं. सगळ्यांची पुन्हा झालेली एक सुंदर भेट म्हणून सुरू झालेला हा प्रवास गडद होत जातो. कुटुंबात पूर्वापार लपवून ठेवण्यात आलेली गुपितं नकळतपणे उघड होतात आणि विचित्र गोष्टी घडायला सुरु होतात. जसजसे सावल्या ढवळून निघतात आणि भूतकाळ वर्तमानात प्रवेश करतो, तसतसे विचित्र घटना घडायला सुरुवात होते. वाड्याची पकड घट्ट होत जाते तसंच काळाच्या चक्राची पुनरावृत्ती होते. कुटुंबातले सदस्य गायब होऊ लागतात. वाडा पछाडलेला असतो का? की तो स्वतःच्याच वंशांवर जगत असतो? घर स्वतःचे अस्तित्व परत मिळवत आहे का, किंवा काहीतरी अधिक भयानक आहे? हे सगळं ‘अंधार माया’पाहिल्यानंतरच उघड होणार आहे.
झी मराठीचे प्रमुख चॅनेल ऑफिसर आणि झी5चे व्यवसाय प्रमुख व्ही. आर. हेमा यांनी असे म्हटले की, ‘ही तर केवळ सुरुवात आहे. अंधार माया ही पहिली मराठी ओरिजनल हॉरर सीरीज ZEE5 वर लाँच करताना झीला अभिमान वाटत आहे. या नव्या, बोल्ड सीरीजच्या माध्यमातून आम्ही ओटीटी विश्वात नवं पाऊल टाकलं आहे. आम्ही कायम नाविन्यावर भर दिला आहे. झी मराठीसह महाराष्ट्रातील पहिले खासगी जीईसी लाँच करण्यापासून झी टॉकीज आणि झी स्टुडिओजच्या माध्यमातून सिनेमा क्रांती घडवत आम्ही सातत्याने मराठी मनोरंजन विश्वाला नवा आयाम दिला. आता आम्ही डिजिटल पातळीवरही हाच वारसा आपली संस्कृती, गोष्टी, लोकांच्या माध्यमातून पुढे घेऊन जात आहोत. कोकणातल्या गूढ पार्श्वभूमीवर घडणाऱ्या अंधार मायामध्ये लोककथा, कौटुंबिक नाती आणि मानसशास्त्रीय रहस्यांनी परिपूर्ण गोष्ट पाहायला मिळणार आहे. यातून स्थानिक पार्श्वभूमी असलेल्या कथा आणि सर्जनशील गुणवत्ता दाखवण्याची आमची बांधिलकी दिसून आली आहे. ही एका नव्या, सशक्त अध्यायाची सुरुवात आहे – ज्यातून महाराष्ट्राची स्वप्नं आणि आवाज प्रत्येक स्क्रीनवर, सर्वत्र जिवंत होणार आहे.’
Jyoti Malhotra चे बांगलादेशाशी आहेत खास संबंध, प्रवास फक्त निमित्त; युट्यूबरने का साधली जवळीक?
दिग्दर्शक भीमराव मुडे यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘अंधार माया या सीरीजमध्ये एक घट्ट मुळं असलेलं, पण अतिशय अपरिचित वाटणारं जग उभं करण्यात आलं आहे, जिथं भावना, आठवणी आणि अनैसर्गिक यांचं एकत्रित अस्तित्व आहे. ट्रेलर लाँच करताना या दुनियेचं पहिलं दार उघडल्यासारखं वाटलं. ही सीरीज सर्वांसमोर सादर करताना आनंद होत आहे. ही गोष्ट भूतकाळातल्या भूतांची आहे, तितकीच ती आपल्यात लपलेल्या भीतीचीही आहे. कोकणातला गूढरम्य निसर्ग नेत्रसुखद आणि भावनांनी परिपूर्ण गोष्ट मांडण्यासाठी योग्य पार्श्वभूमी देणारा होता. मला आशा आहे, की प्रेक्षक या सीरीजमध्ये गुंतून जातील, हेलावतील आणि पूर्ण वेळ थरार अनुभवतील, कारण या सीरीजमध्ये काय पाहायला मिळणार आहे याची ही फक्त एक झलक आहे.’
तर अभिनेते किशोर कदम यांनी असे सांगितले की, ‘अंधार माया मालिकेत गोन्याची व्यक्तीरेखा करणं हा माझ्या करियरच्या सुंदर प्रवासातला सर्वात भीतीदायक टप्पा होता. तो मोजकं बोलतो, पण त्याच्या आत कित्येक शतकांची शांतता आणि रहस्यं दडलेली आहेत. ट्रेलरमध्ये आम्ही उभारलेल्या विश्वाची झलक दिसते, पण विश्वास ठेवा, खरा थरार गोष्ट उलगडायला लागल्यानंतर सुरू होईल. ही गोष्ट भावनाप्रधान, अस्वस्थ करणारी आणि प्रत्येक क्षणाला धडधड वाढवणारी आहे. भीमराव मुडे आणि त्यांच्या मेहनती टीमबरोबर काम करणं आणखी खास होतं. ही सीरीज नेहमीच्या हॉरर सीरीजसारखी नाही – ती रेंगाळते, कुजबुजते आणि तुमच्या आत दडून राहाते. आमच्या विश्वात पाऊल टाकल्यानंतर प्रेक्षक कसे प्रतिसाद देतात हे पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे.’