(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील अशोक मा.मा. मालिका प्रेक्षकांना भावनिक आणि तणावपूर्ण प्रवासावर घेऊन थांबली आहे. गणपती विसर्जनानंतर सुरू झालेला नीलिमाच्या शोधाचा धडपडीतला प्रवास आता एका नव्या वळणावर येऊन ठेपला आहे. घरातील सर्वांच्या मदतीने नीलिमाचा ठावठिकाणा लागतो आणि एक क्षणभरासाठी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. परंतु, जेव्हा अशोक मा.मा. नीलिमेला भेटायला जातात तेव्हा तिचं थंड, कठोर वागणं पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. रक्ताचं नातं असूनही नीलिमा मामांच्या डोळ्यात डोळे न पाहता दार बंद करते. तिच्या आयुष्यात नक्की काय घडतंय, ती इतकी बदलली कशी,हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला आहे. आता या मालिकेमध्ये पुढे काय घडते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
‘आई तुळजाभवानी’ मालिकेचा सुरु झाला नवा अध्याय, ‘या’ अभिनेत्रीने केली एन्ट्री
याचवेळी अशोक मा.मांना काही लोकांकडून नीलिमाच्या बिकट परिस्थितीबद्दल माहिती मिळते. घरात उभ्या असलेल्या संकटांमध्ये आता नीलिमाचा नवरा अनिशच्या वागण्यामुळे आणखी गोंधळ वाढतो. त्याने लोकांकडून घेतलेले पैसे वसूल करण्यासाठी थेट अशोक मामांच्या घरी पोहचतो. परिस्थिती हाताबाहेर जात असतानाच नीलिमा मामांशी उद्धटपणे वागते. असे वागण्यामागचे कारण काय असेल? दुसरीकडे भैरवी तिच्या आयुष्याचं एक वेगळंच स्वप्न जगते आहे. तिच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय आहे. पण वैयक्तिक नात्यांमधील कटुता आणि अनिशसोबतचे सततचे वाद तिचं आयुष्य गुंतागुंतीचं करत आहेत. हे सगळं मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.
वल्लरी देणार का मनोजला घटस्फोट? ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेला नवं वळण
एका बाजूला नीलिमाच्या मनातील गुपित आणि तिच्या नात्यांचा ताण, तर दुसऱ्या बाजूला भैरवी- अनिशमधील वाढत चाललेली दरी या पार्श्वभूमीवर अशोक मामांच्या मनात एकच प्रश्न घुमतो नीलिमाच्या अश्या वागण्यामागचे कारण काय ? मामा हि नात्यातील गुंतागुंत कशी सोडवणार? ते नक्की पुढे काय करणार? हे पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.