Zee Marathi: शूटिंगच्या सेटवर जुळली खास मैत्री (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Zee Marathi Serial Actress : टिव्ही मालिकांचं शूटिंग म्हणजे फक्त कॅमेरा, लाईट आणि संवाद एवढंच नसतं. तर दिवसातील अनेक तास एकत्र काम करताना कलाकारांमध्ये आपोआप जिव्हाळा निर्माण होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत सुरु असलेल्या चित्रीकरणात एकत्र मेहनत, गप्पा, जेवण, मस्ती आणि एकामेकांना दिलेली साथ यामुळे अनेक नाती अधिक घट्ट होतात. काही सहकलाकार पुढे जाऊन कुटुंबातील सदस्यांप्रमाणे जवळचे होतात. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने झी मराठीवरील काही लोकप्रिय कलाकारांनी सेटवर जुळलेल्या या खास मैत्रीबद्दल मनमोकळ्या भावना व्यक्त केल्या.
‘कमळी’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी विजया बाबर हिने सांगितलं की, मालिकेच्या संपूर्ण टीमसोबत तिचं उत्तम नातं आहे. मात्र साक्षी आणि निखिल यांच्याशी तिची विशेष मैत्री झाली आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच साक्षी तिच्यासोबत असल्यामुळे दोघींचा एकमेकांवर मोठा विश्वास आहे. कामाच्यावेळी असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादा प्रसंग, दोघी कायम एकमेकींच्या पाठीशी उभ्या असतात. कधी साक्षीला एखाद्या दृश्याची चिंता वाटली किंवा ती अस्वस्थ झाली तर विजया तिला धीर देते. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांचं नातं दिवसेंदिवस अधिक मजबूत झालं आहे.
‘कमळी‘ मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारी विजया बाबर हिने सांगितले की, मालिकेच्या संपूर्ण टीमसोबतच तिचं उत्तम नातं आहे. मात्र साक्षी आणि निखिल यांच्याशी तिची विशेष मैत्री झाली आहे. मालिकेच्य सुरुवातीपासूनच साक्षी तिच्यासोबत असल्यामुळे दोघींचा एकामेकांवर मोठा विश्वास आहे. कामाच्यावेळी असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील एखादा प्रसंग, दोघी कायम एकामेकींच्या पाठीशी उभ्या असतात. कधी साक्षीला एखाद्या दृश्याची चिंता वाटली किंवा ती अवस्थ झाली तर विजया तिला धीर देते. या छोट्या-छोट्या गोष्टींमुळे त्यांचं नातं दिवसेंदिवस अधिक घट्ट होत जात.
निखिलबद्दल बोलताना विजयाने सांगितलं की, त्याच्या विनोदी स्वभावामुळे सेटवर नेहमी आनंदाचं वातावरण असतं. थोडा वेळ मिळाला की सगळे मिळून गप्पा मारतात, खाण्याचा आनंद घेतात आणि दिवसातील थकवा विसरून जातात. त्यामुळे शूटिंगचं ठिकाण आता तिच्यासाठी कामाची जागा नसून दुसरं घर बनलं आहे.
‘शुभ श्रावणी’ मालिकेतील वल्लरी विराजनेही तिच्या खास मैत्रिणीबद्दल सांगितलं. मालिकेत स्वीटीची भूमिका करणारी भूमिजा पाटील ही तिची सर्वात जवळची मैत्रीण असल्याचं तिने सांगितलं. दोघींनी याआधीही एकत्र काम केलं असल्यामुळे त्यांचं नातं आधीपासूनच घट्ट होतं. आता या मालिकेमुळे ते आणखी मजबूत झालं आहे. मोठे संवाद पाठ करताना, कठीण दृश्यांची तयारी करताना किंवा एखाद्या प्रसंगात अडचण आली तर त्या एकमेकींना मदत करतात.
शूटिंगदरम्यान संध्याकाळच्या वेळेला कॉफी आणि चॉकलेटचा छोटासा ब्रेक हा त्यांच्या दिवसातील आवडता क्षण असतो. त्या दोघींना संगीताचीही आवड असल्यामुळे मेकअप रूममध्ये गाणी ऐकणं, हसत-खेळत वेळ घालवणं आणि कधी अचानक नाचायला सुरुवात करणं हे नेहमीच सुरू असतं. अनेकदा त्या एकत्रच शूटिंगला येतात आणि एकत्रच परततात. त्यामुळे एखाद्या दिवशी भूमिजा सेटवर नसली की काहीतरी कमी असल्याची भावना वल्लरीला होते.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील प्राप्ती रेडकरने तिच्या दोन खास मैत्रिणींची नावं घेतली. भाग्यश्री दळवी आणि मेघा धाडे या दोघी तिच्यासाठी केवळ सहकलाकार नाहीत, तर जवळच्या मैत्रिणी आहेत. सध्या तिघींचं एकत्र शूटिंग कमी होत असल्यामुळे त्यांची आठवण सतत येते, असं प्राप्तीने सांगितलं. मोकळा वेळ मिळाला की त्या तिघी मिळून रील्स तयार करतात, खेळ खेळतात, गप्पा मारतात, आवडते पदार्थ खातात आणि भरपूर हसतात.
Aishwarya Narkar: भूमिका पडली महाग! “ही बाई मरत का नाही” म्हणत ऐश्वर्या नारकर यांना पडल्या शिव्या
प्राप्तीच्या मते, भाग्यश्री आणि मेघा या दोघी तिची खूप काळजी घेतात. कामाबरोबरच आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहायला त्यांनीच शिकवलं. मालिकेत त्यांच्या व्यक्तिरेखा एकमेकींशी भिडताना दिसतात, पण कॅमेरा बंद झाला की त्यांच्यातील मैत्री सर्वांनाच हेवा वाटावा अशी असते. अनेकदा त्या शूटिंगनंतरही एकत्र वेळ घालवतात आणि छोट्या भेटींचा आनंद घेतात.
प्रेक्षकांना पडद्यावर वेगवेगळ्या भूमिका दिसतात, पण त्या भूमिकांच्या मागे अशी अनेक सुंदर नाती तयार होत असतात. एकत्र काम करताना निर्माण झालेला विश्वास, आधार आणि प्रेम हीच या कलाकारांची खरी कमाई आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने त्यांनी सांगितलेल्या या आठवणी प्रत्येकाला आपल्या जवळच्या मित्रांची आठवण करून देतात. प्रसिद्धीच्या जगातही खरी मैत्री टिकू शकते, याचं हे सुंदर उदाहरण म्हणायला हरकत नाही.






