अल्लू अर्जून पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये, तब्बल साडेतीन तास चौकशी; हैदराबादमध्ये नेमकं काय घडतंय?
हैदराबादच्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनचा जामीन मंजूर करत दिलासा दिला आहे. पोलिसांनी आज सकाळीच अभिनेत्याला त्याच्या हैदराबाद येथील घरातून अटक करण्यात आली होती. ‘पुष्पा २’च्या प्रिमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. मृत पत्नीच्या पतीने अभिनेत्याविरोधात चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली होती. अटक केल्यानंतर आज सकाळी अभिनेत्याला हैदराबाद पोलिसांनी चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले होते.
उच्च न्यायालयाकडून निर्णय आला त्यावेळी अल्लू अर्जुनला कनिष्ठ न्यायालयाकडून चेंगराचेंगरीप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, आता उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला मोठा दिलासा देत अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
अल्लू अर्जुनच्या अटकेवर बॉलिवूडमधली पहिली प्रतिक्रिया, वरुण धवन काय म्हणाला ?
प्रीमियरवेळी ४ डिसेंबर रोजी अल्लू अर्जुन हैद्राबादमधल्या संध्या थिएटरमधून बाहेर पडल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला असून चौघे लोकं जखमी झाले होते. त्या जखमींमध्ये तिच्या मुलाच्याही समावेश आहे. त्या महिलेचा मुलगा गंभीर जखमी झाला होता. या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुनला शुक्रवारी सकाळी अटक केली. पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक करताच त्याने त्याच्या वकिलाच्या माध्यमातून तातडीने सुनावणीची मागणी करत हायकोर्टात जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्याच्या जामिनेच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने अभिनेत्याला अंतरिम जामीन मंजूर करण्याचे आदेश दिले आहेत.
‘जेवायला सुद्धा दिलं नाही, सरळ बेडरूममधून नेलं…’, अल्लू अर्जुनने अटकेवर केला आक्षेप!
उच्च न्यायालयाने अभिनेत्याचा जामीन मंजूर केल्यानंतर अल्लू अर्जुन भावुक झालेला दिसला. आज सकाळीच पोलिसांनी त्याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले होते. तेव्हा त्याची पत्नी चिंतेती दिसली. याचे व्हिडिओ व्हायरल झाले. मला ना धड नाश्ता करु दिला ना कपडे बदलायचा वेळ दिला अशी तक्रार अल्लू अर्जुनने केली होती. दिवसभरात पोलिस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढल्यानंतर अखेर त्याला दिलासा मिळाला आहे. माजी मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी अल्लू अर्जुनच्या अटकेचा तीव्र निषेध केला. “अल्लू अर्जुन चेंगराचेंगरीत सहभागी नव्हता, त्यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला अटक करणे मान्य नाही, मी अटकेचा निषेध करतो.” असे ते म्हणाले.