उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सतत सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. ज्यामुळे पोटात जळजळ होणे, ऍसिडिटी वाढणे, गॅस, अपचन इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र सतत गोळ्यांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून तात्काळ आराम मिळवावा. वाढलेली ऍसिडिटी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात थंड पेयांचे सेवन करावे. यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन तात्काळ आराम मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात अॅसिडिटीपासून तात्काळ अराम मिळवण्यासाठी नियमित करा 'या' पेयांचे सेवन
वर्षाच्या बाराही महिने बाजारात काकडी उपलब्ध असते. काकडी खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेले पाणी शरीरात थंडावा कायम टिकवून ठेवतात.
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लिंबू पाणी प्यावे. यामध्ये फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम इत्यादी अनेक घटक आढळून येतात. याशिवाय वाढलेले वजन कमी करताना लिंबू पाण्याचे सेवन करावे.
नारळ पाणी शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करते. नारळ पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
जेवणानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी बडीशेपचे पाण्याचे सेवन करावे. हे पाणी शरीर थंड ठेवण्यासाठी मदत करते. अॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी बडीशेप पाणी प्यावे.
उन्हाळ्यात ताक पिणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे मानले जाते. यामुळे शरीर थंड राहते. अॅसिडिटी, अपचन आणि जळजळ कमी करण्यासाठी दह्याचे किंवा ताकाचे सेवन करावे.