'या' पदार्थांचे सेवनामुळे किडनी सडून तयार होतो कचऱ्याचा साठा
किडनीचे आरोग्य कशामुळे बिघडते?
किडनीमध्ये कचरा साठवून ठेवणारे पदार्थ?
किडनीच्या आजाराची लक्षणे?
मानवी शरीरातील किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करते, विषारी घटक बाहेर काढून टाकते इत्यादी अनेक कामे करते. शरीरातील किडनी सुमारे 1,500 मिली पेक्षा जास्त कचरा आणि विषारी घटक लघवीवाटे बाहेर काढून टाकते. तसेच शरीरातील आवश्यक खनिजांचे संतुलन नियंत्रणात ठेवण्याचे महत्वपूर्ण काम किडनी करते. लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवणारे हार्मोन्स किडनीमुळेच तयार होतात. पण बऱ्याचदा शरीराला इतर आजारांपासून वाचवताना किडनीचे आरोग्य बिघडून जाते. उच्च रक्तदाब, हृदयविकार, अल्कोहोलचे अतिसेवन, डायबिटीज, हिपॅटायटीस सी यांसारख्या गंभीर विषाणूंमुळे किडनीचे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. किडनीच्या आजारांची लागण झाल्यानंतर शरीरात असंख्य बदल दिसून येतात. या बदलांकडे वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
किडनी स्टोन, एक्यूट किडनी इंजरी किंवा किडनीला इजा, क्रॉनिक किडनी डिसीज झाल्यानंतर किडनीचे कार्य मंदावते आणि किडनी योग्यरित्या रक्त शुद्ध करत नाही. शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जाण्याऐवजी शरीरात तसेच साचून राहतात. किडनीचे आरोग्य बिघडण्यास जीवनशैलीतील चुका आणि आहार कारणीभूत ठरतो. त्यामुळे सोडियम आणि अतिप्रमाणात चरबी असलेल्या पदार्थांचे सेवन करणे टाळावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला किडनीचे आरोग्य बिघडण्यास कोणते पदार्थ कारणीभूत ठरतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
दैनंदिन आहारात अनेकांना सतत बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्याची खूप जास्त सवय असते. आहारात कायमच चिकन, मटण इत्यादी तेलकट आणि अतिमसालेदार पदार्थ खाण्यास खूप जास्त आवडतात. बेकन, सॉसेज, हॉट डॉग, डेली मीट आणि बर्गर पॅटीज यांसारखे चविष्ट पदार्थ बनवण्यासाठी शिळे आणि प्रक्रिया केलेले मांस वापरले जाते. ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. दररोज 2,300 मिलीग्रामपेक्षा जास्त सोडियमचे केल्यामुळे उच्च रक्तदाब आणि किडनीसंबंधित आजार होतात. यामुळे किडनीवर जास्तीचा तणाव येतो आणि आरोग्य बिघडते.
लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. पिझ्झाचे सेवन अतिशय आवडीने केले जाते. व्हाईट ब्रेड क्रस्ट, हाय सोडियम टोमॅटो सॉस, पनीर आणि सॉसेज किंवा पेपरोनी यांसारख्या प्रक्रिया केलेल्या मासांपासुन बनवलेले पदार्थ शरीरासाठी खूप घातक आहेत. या पदार्थांमध्ये खूप जास्त प्रमाणात सोडियम असते.
थंडीच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर सूप प्यायले जाते. सूप प्यायल्यामुळे सर्दी खोकला कमी होण्यास मदत होते. पण बाजारात विकत मिळणाऱ्या सूपच्या पाकिटांचे अजिबात सेवन करू नये. या सूपमध्ये मिठाचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे सूप पिण्याची इच्छा झाल्यास भाज्या स्क्रॅप्स, औषधी वनस्पती किंवा सोडियम नसलेल्या पदार्थांचे सेवन करावे.
चायनीज बनवताना सोया सॉसचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. चवीला टेस्टी लागणारा सॉस आरोग्यासाठी घातक ठरतो. यामध्ये सोडियमचे प्रमाण खूप जास्त असते. सोया सॉसच्या प्रति चमचे सॉसमध्ये 950 मिलीग्रॅम सोडियम आढळून येते. त्यामुळे पदार्थाची चव वाढवण्यासाठी घरी तयार केलेल्या मसाल्यांचा वापर करावा. याशिवाय मशरूम, टोमॅटो पेस्ट किंवा व्हिनेगरसारखे पदार्थ वापरावे.
Ans: लघवीचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे, फेसाळ लघवी किंवा लघवीतून रक्त पडणे.
Ans: अनियंत्रित रक्तदाब किडनीच्या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवतो.
Ans: शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी.






