संपूर्ण देशभरात महाशिवरात्री सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जात आहे. यादिवशी महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. अनेक लोक उपवासाच्या दिवशी फक्त पाणी पितात. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होते आणि थकवा अशक्तपणा वाढू लागतो. उपवासाच्या दिवशी पचनास जड असलेल्या साबुदाण्याचे सेवन करण्याऐवजी सहज पचन होणाऱ्या या पदार्थांचे सेवन करावे. हे पदार्थ शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. सात्विक अन्नामध्ये ताजी फळे, भाज्या, धान्ये आणि नैसर्गिक पदार्थांचा समावेश करावा. (फोटो सौजन्य – istock)
उपवासाच्या काळात अशक्तपणा येऊ नये म्हणून करा 'या' पदार्थांचे सेवन, शरीराला मिळेल तात्काळ ऊर्जा

फळे खाणे शरीरासाठी खूप जास्त फायदे आहे. फळांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे फळांची स्मूदी किंवा फळांचा रस प्यावा.

उपवास केल्यानंतर सगळ्यात पहिली आठवण साबुदाण्याची येते. पण उपाशी पोटी साबुदाणे खाल्ल्यामुळे अपचन आणि ऍसिडिटी वाढते. त्यामुळे बारीक केलेल्या साबुदाण्याच्या पिठापासून पराठा बनवून खावा.

उपवास केल्यानंतर रताळ खावे. शिजवलेले किंवा भाजलेले रताळ उपवासाच्या दिवशी खाल्ले जाते. याशिवाय रताळ्याचा वापर करून तुम्ही चाट सुद्धा बनवू शकता.

उपवासाच्या दिवशी मखाणा खीर खावी. मखाणा खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर पोषण आणि कॅल्शियम मिळते. याशिवाय शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो.

उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात ताज्या फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. याशिवाय फळांमध्ये असलेले गुणकारी घटक शरीराची ताकद वाढवतात.






