उन्हाळ्याच्या दिवसांत तीव्र उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. प्रचंड उष्णतेमुळे शरीरातून घाम येऊ लागतो, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांत स्वत:ला हाइड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अशावेळी अनेकजण पॅक्ड जूस आणि कोल्ड ड्रिंक्सऐवजी पारंपरिक पेयांची निवड करतात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात आणि शरीर हाइड्रेट राहते. (फोटो सौजन्य – Pinterest)
कोल्ड ड्रिंक्सला म्हणा बाय! उष्णतेपासून बचाव करतील हे 5 देशी पेय; आजच करा ट्राय

आंब्याचे पन्ह - उन्हाळा सुरु झाला आणि आंब्याचा उल्लेख झाला नाही, असं होणं अशक्य आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत आंब्याचे पन्ह सर्वाधिक पिले जाणारे पारंपरिक पेय आहे. कच्चा कैऱ्या उकडून त्याचा पल्प काढला जातो. त्यानंतर त्यामध्ये काळे मीठ, भाजलेल्या जिऱ्याची पूड, पुदिना आणि साखर किंवा गूळ घालून हे पेय तयार केले जाते.

ताक - उन्हाळ्यात ताक पिल्याने शरीराला अनेक ओराग्यदायी फायदे मिळतात. दही घुसळून त्यात पाणी, भाजलेले जिरे, हिंग, काळे मीठ आणि बारीक चिरलेला पुदिना घालून घरीच ताक तयार करू शकता.

बेल सिरप - उन्हाळ्यात बेलफळ देखील फायदेशीर मानले जाते. बेलफळाच्या कठीण सालीतील गर पाण्यात कुस्करून आणि गाळून पाक तयार केला जातो. त्यानंतर यामध्ये थोडी साखर घालून बेल सिरप तयार केले जाते.

सत्तू सिरप - हे पारंपरिक पेय बिहार आणि उत्तर प्रदेशातील विशेषत: आहे. हे पारंपरिक पेय पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि बराच वेळ पोट भरलेले राहते. ज्यामुळे अति खाणे टळते.

लिंबूपाणी - भारतातील प्रत्येक घरातील आवडते आणि पारंपारिक पेय म्हणजे लिंबूपाणी. पाण्यात लिंबाचा रस, साखर, काळे मीठ आणि चिमूटभर चाट मसाला घालून लिंबूपाणी तयार केले जाते. ऊन्हातून आल्यानंतर थंडगार लिंबूपाणी पिल्याने शरीराला ताजेतवाणे वाटते.






