Maharashtra MLC Election: विधान परिषद निवडणूक बिनविरोध! १० उमेदवारांचे अर्ज वैध, अपक्षांचे अर्ज बाद
Maharashtra Legislative Council Election 2026: राज्यातील विधान परिषद निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून, ही निवडणूक आता बिनविरोध होण्याची शक्यता स्पष्ट झाली आहे. ९ जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार होते.
उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी पार पडली. यामध्ये अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणाऱ्या चार उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे उरलेल्या सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. याबाबतची अधिकृत घोषणा सोमवारी (ता. ४) होण्याची शक्यता आहे.
Protocol for MPs and MLAs: दोषी आमदार-खासदारांना ‘स्पेशल ट्रिटमेंट’ बंद! राज्य सरकारचा मोठा निर्णय
या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) कडून पाच उमेदवारांसह पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शिवसेना शिंदेगटा कडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) कडून एक आणि शिवसेना ठाकरे गटाकडून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता.
छाननीनंतर भाजपचे ५, शिवसेना (शिंदे) २, राष्ट्रवादी काँग्रेस १ आणि शिवसेना (ठाकरे) १ असे एकूण ९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे या सर्व उमेदवारांची आमदारकी निश्चित झाली आहे.
आमदारकी निश्चित झालेले उमेदवार :
भाजप : प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनिल कर्जतकर, प्रज्ञा सातव
शिवसेना (शिंदे) : निलम गोऱ्हे, बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेस : झिशान सिद्दीकी
शिवसेना (ठाकरे) : अंबादास दानवे
दरम्यान, या निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. एकनाथ शिंदे गट तिसरा उमेदवार देईल, अशी चर्चा होती. मात्र, तसे झाले नाही. काँग्रेसमध्ये नाराजी असली तरी ठाकरे गटाच्या नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर काँग्रेसने अंबादास दानवे यांना पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अखेर कोणतीही निवडणूक लढत न होता सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






