उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला होता. रिक्त असलेल्या ९ जागांसाठी अखेर ९ च उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले…
शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्याकडून झालेल्या मनधरणीला यश आले आहे.
शिवसेना (UBT) कडून अंबादास दानवे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर, काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपण स्वतंत्र उमेदवार उभा करू, असे ठामपणे सांगितले.
मे महिन्यात ९ विधान परिषदेच्या जागा रिक्त होणार आहेत. भाजपच्या ४, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाची प्रत्येकी १ जागा रिक्त होणार आहे.