BJP-Congress Politics: छात्रों की गुंज! फडणवीसांचा वार सतेज पाटलांचा पलटवार; पुण्यात राजकारण तापणार
देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमामागील राहुल गांधींच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटल आहे की, “हा खरोखरच ‘छात्रोंची गुंज’ कार्यक्रम आहे की राहुल गांधी केवळ स्वतःसाठी एक नवीन राजकीय व्यासपीठ शोधतायेत, हे मला माहीत नाही. पण राहुल गांधींनी सरसकट तरुणांशी संवाद साधला असता तर आनंद झाला असता. पण माझ्याकडील माहितीनुसार, काँग्रेसशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांनाच सहभागी होण्याची परवानगी दिली जात आहे.” असा दावा केला आहे.
हा कार्यक्रम नियंत्रित वातावरणात आयोजित केला जात आहे. पुणे आणि आसपासच्या परिसरातील काँग्रेस-समर्थित शैक्षणिक संस्थांमधील केवळ विद्यार्थिनींचीच नोंदणी करण्याचे आणि सहभागी होण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. फक्त विद्यार्थिनींनाच कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जाईल. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत नियंत्रित वातावरणात आयोजित केला जात आहे. हा खरा संवाद नसून, आमंत्रित प्रेक्षकांसमोर काँग्रेस पक्षाने केलेले एकतर्फी भाषण असेल. असा आरोपही देवेंद्र फडणवीसांनी केला.
फडणवीस यांच्या या आरोपांवर आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “मुख्यमंत्री फडणवीसांनी राहुल गांधींच्या या कार्यक्रमाची धास्ती घेतल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होत आहे. छात्रो की गुंज कार्यक्रमाच्या माध्यामातून लाखो युवक-युवतींना राहुल गांधींमध्ये एक आशेचा किरण दिसत आहे. हे कार्यक्रमातून सिद्ध झालं आहे. पण आता सत्ताधाऱ्यांकडून या कार्यक्रमाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. छात्रों की गुंज हा कार्यक्रमासाठी क्यु आर कोड देण्यात आला आहे. तो स्कॅन करून विद्यार्थीनींनी यायचं आहे. असे असले तरी इतर सर्वांसांठी देखील हा कार्यक्रम फ्री आहे. या कार्यक्रमाची व्याप्ती पाहून भाजपने धास्ती घेतली आहे. पण देशातील युवक-युवतींना राहुल गांधींमध्ये जो आशेचा किरण दिसत आहे. त्यातून आम्ही आमचे काम करत राहणार आहोत, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
Vinod Tawade Special: भाजपचे छुपे चाणक्य..! विनोद तावडे कसे बनले भाजपचे प्रमुख निवडणूक रणनीतीकार
राहुल गांधींच्या राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कूल्स इको’ मोहिमेचा एक भाग म्हणून, २२ ऑगस्ट रोजी पुण्यातील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थिनी शिक्षण, सुरक्षा, स्पर्धा परीक्षा आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील.
पोलिसांनी घालून दिलेल्या ३० अटींपैकी, आक्षेपार्ह चित्रे किंवा बॅनर लावण्यास मनाई आहे. तसेच, कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खात्री आयोजकांना करावी लागेल. पुणे पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार, शहरातील आरटीओ चौकाजवळील एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर सायंकाळी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, तिथे ८,००० ते १०,००० लोक जमण्याची शक्यता आहे.






