'मागे दिले नाही, आता तरी मंत्रिपद द्या'; एकनाथ शिंदेंच्या 'या' आमदाराची जाहीरपणे नाराजी
कोल्हापूर : कोल्हापुरातील शिवसेनेमध्ये मंत्रिपदावरून अंतर्गत खदखद पुन्हा एकदा बाहेर आली आहे. पालकमंत्रिपद प्रकाश आबिटकर यांना मिळाल्याने शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे नाराज असल्याचे बोलले जात होते. मात्र, अडीच वर्षानंतर पुन्हा मंत्रिपद मिळेल, अशी आशा आमदार क्षीरसागर यांना आहे. आता हे मंत्रिपद आपल्याला मिळावे, अशी मागणी करत क्षीरसागर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करून दाखवली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्ष वाढीसाठी प्रचंड मेहनत घेतात. यापूर्वीही घेत होते. पण आता ज्यांची मंत्रिपदासाठी निवड झाली आहे, त्यांनी इतर जिल्ह्यांमध्ये देखील पक्ष वाढीसाठी काम केले पाहिजे. शिवसेनेत अनेक बाहेरची लोक येऊन मंत्रिपद मिळाल्यामुळे त्यांना पक्ष वाढीचे महत्व कदाचित कळालेले नाही. शिवसेनेतील मंत्र्यांनी पक्ष वाढीसाठी काय केले? याचं रिपोर्ट कार्ड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घ्यावे, अशी थेट मागणीच क्षीरसागर यांनी केली आहे.
‘परभणीच्या विकासाची चिंता करू नका, महायुती सरकार पाठीशी’; एकनाथ शिंदेंचा संजय जाधवांना शब्द
प्रकाश आबिटकर यांना अप्रत्यक्षपणे टोला
पक्षवाढ न होण्याला प्रकाश आबिटकर जबाबदार आहेत का? यावर बोलताना क्षीरसागर म्हणाले, मी दुसऱ्या कोणावरही टीका करणार नाही. पण माझ्या ऑफिस समोर नेहमी गर्दी असते, तशी दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये गर्दी नसते. तुमच्या दारात जेवढ्या चपला तेवढी तुमची श्रीमंती. प्रत्येकाला कमी वेळेत न्याय द्यावा ही माझी काम करण्याची पद्धत आहे, अशा शब्दांत त्यांनी आपली खंत व्यक्त करत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
…ते जरांगेंचे कसे होणार?
मनोज जरांगे पाटील प्राण पणाला लावून आंदोलन करत आहेत, समाजाचे नेतृत्त्व करत आहेत. उपोषण करून त्यांची प्रकृती खूप खालावली आहे. मी हे स्वत: पाहिले आहे. संजय जाधव यांना निवडून आणण्यासाठी जरांगे पाटील यांची मदत झाली होती. पण जे कुणी बंडू-झंडू जाधव आहेत, जे ठाकरेंचे झाले नाहीत, ते जरांगेंचे कसे होणार? ते नेहमी नवीन आई-बाप शोधत असतात, अशा खोचक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्यावर टीका केली आहे.






