पालकमंत्री उदय सामंत यांच्या विधानामुळे महायुतीत ठिणगी?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीमधील मित्रपक्षातील काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. ते म्हणाले, “वरिष्ठ नेते महायुती करण्यास तयार असताना, मित्रपक्षातील काही पिलावळ जर स्वबळाचा नारा देत असतील, तर त्यांना आपले धनुष्यबाण काय असते हे दाखवण्याची वेळ आली आहे.” या शब्दांत त्यांनी अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम आणि भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
उदय सामंत पुढे म्हणाले की, “शिवसेनेने मदत केली नसती, तर येथे अजित पवार गटाचे आमदार शेखर निकम निवडून आले नसते. तरीदेखील ते स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे सांगत असतील, तर त्यांनी एकदा माजी आमदार सदानंद चव्हाण आणि मला सांगावे. नाहीतर नुसती चिवचिव सहन केली जाणार नाही.” त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी महायुतीतील दोन मित्रपक्षांच्या नेत्यांना थेट इशारा दिला असून, त्यांच्या या विधानामुळे महायुतीत ठिणगी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सविस्तर बातमी थोड्याच वेळात अपडेट केली जाईल