तासगावच्या द्राक्ष संशोधन केंद्राकडे दुर्लक्ष का? सांगलीच्या आमदारांचा लक्षवेधीद्वारे सरकारला सवाल
जिल्ह्यात अंदाजे २५ ते ३० हजार हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड असून दरवर्षी सुमारे ५ ते ६ लाख मेट्रिक टन द्राक्ष उत्पादन घेतले जाते. तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, पलूस, मिरज आणि जत है तालुके द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. तासगाव परिसराला राज्यात द्राक्ष उत्पादनाचे प्रमुख केंद्र मानले जाते. सांगली जिल्ह्यातील द्राक्षे देशांतर्गत बाजारपेठेसह युरोप, आखाती देश आणि आशियातील विविध देशांमध्ये निर्यात केली जातात.
Sangli News: सांगलीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा गटनेता निवडताना झाली गडबड..!
सांगलीचा द्राक्ष पट्टा : महत्त्वाची आकडेवारी
द्राक्ष लागवड क्षेत्र : सुमारे २५ ते ३० हजार हेक्टर
वार्षिक उत्पादन: ५ ते ६ लाख मेट्रिक टन
तालुके प्रमुख
तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, कडेगाव, पलूस, मिरज, जत
दरवर्षी निर्यात सुमारे १५०० कंटेनर द्राक्षे
यंदा अडकलेले कंटेनर : सुमारे ७००
एक एकर द्राक्षचाग खर्च : ४ ते ५ लाख रुपये
यंदा नुकसान: ५० टक्क्यांपेक्षा जास्त बागा फेल
संशोधन केंद्राचे काय झाले ? आ. डॉ. विश्वजीत कदम
अधिवेशनात आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीतील द्राक्ष उत्पादकांच्या प्रश्नांवर लक्ष वेधताना सांगली येथे मंजूर झालेले द्राक्ष संशोधन केंद्र नेमके कुठे गेले? असा सवाल उपस्थित केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सांगली येथे द्राक्ष संशोधन केंद्र मंजूर करण्यात आले होते आणि अर्थसंकल्पात निधीची तरतूदही करण्यात आली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर या केंद्राबाबत कोणतीही ठोस प्रगती झालेली दिसत नाही, असे त्यांनी सांगितले. अनियमित पाऊस, वातावरणीय बदल, वाढता उत्पादन खर्च णि कीटकनाशकांचा वाढता वापर यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक तणावात सापडत असल्याचे त्यांनी नमूद केले.
आ. सुहास बाबर यांनी लक्षवेधीद्वारे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीसमोरील अडचणी सभागृहात मांडल्या. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्यात प्रक्रियेवर परिणाम झाला असून जेएनपीटी बंदरावर सांगली जिल्ह्यातील सुमारे ७०० पेक्षा अधिक द्राक्ष कंटेनर अडकून पडले असल्याचे त्यांनी सांगितले. दरवर्षी सांगली जिल्ह्यातून साधारण १५०० कंटेनर द्राक्षांची निर्यात केली जाते आणि या माध्यमातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. मात्र सध्याच्या परिस्थितीत निर्यात ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, खानापूर तालुक्यातील भिवघाट येथे द्राक्ष संशोधन केंद्र उभारण्यासाठी जागा करून उपलब्ध देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
Pune Weather: यंदा काय खरे नाही! पुणे आणखी तापणार; पारा थेट ३९ अंश सेल्सिअस…
तासगाव-कवठेमहांकाळचे आ. रोहित आर. आर. पाटील यांनी लक्षवेधी क्र. ४ च्या माध्यमातून द्राक्ष व बेदाणा उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधले. परदेशातून येणाऱ्या कमी दर्जाच्या अफगाणी व इतर बेदाण्यांच्या आयातीमुळे स्थानिक शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. आयात मालाची कठोर गुणवत्ता तपासणी, सीमाशुल्क वाढ आणि शेतकरी हिताचे धोरण राबवण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. वाढता उत्पादन खर्च, हवामान बदल, गारपीट आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे शेतकरी अडचणीत सापडल्याचेही त्यांनी सांगितले, तासगाव येथे ‘टेबल ग्रेप्स साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी त्यांनी सभागृहात मांडली.






