फोटो सौजन्य- pinterest
श्रीरामाचे मैत्रीचे संबंध निस्स्वार्थी, विश्वासू आणि जात-पात/दर्जा न पाहणारे होते. त्यांनी निषादराज गुह, सुग्रीव आणि विभीषण यांसारख्या विविध वर्गातील लोकांना आपले मित्र मानून खऱ्या मैत्रीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला होता. संकटात साथ देणे, दिलेल्या वचनाचे पालन करणे आणि मित्राच्या हितासाठी प्रयत्न करणे ही त्यांच्या मैत्रीची प्रमुख वैशिष्ट्ये होती.
रामाने कधीही मैत्रीतून स्वार्थ साधला नाही. त्यांनी सुग्रीवाला त्याचा अधिकार मिळवून दिला आणि विभीषणाला लंकापती बनवले, पण बदल्यात काहीही मागितले नाही. तीन तीन राज्यांचे त्याने त्याग केले. निषादराज गुह (भिल), सुग्रीव (वानर) आणि विभीषण (राक्षस) यांसारख्या विविध लोकांशी त्यांनी सख्य केले. रामाने मैत्रीत दिलेल्या वचनाचे पालन नेहमी केले. बाली वधाचे वचन असो किंवा सुग्रीवाला राजा बनवण्याचे, त्यांनी ते पूर्ण केले. सुग्रीव जेव्हा बालीच्या भीतीमुळे निर्वासित होता, तेव्हा राम त्याच्या पाठीशी उभे राहिले. रामाने आपल्या मित्रांना नेहमी मान-सन्मान दिला. निषादराजाला सपरिवार अयोध्या भेटीचे निमंत्रण देणे हे त्याचे उदाहरण आहे. हनुमानजी आणि राम यांचा संबंध मैत्रीबंधानापेक्षा वेगळे होते, जो निस्सीम भक्ती आणि विश्वासावर आधारित होता.
भगवान श्रीराम हे केवळ आदर्श पुत्र, राजा किंवा पतीच नव्हते, तर ते एक अतिशय उत्तम मित्रही होते. त्यांच्या आयुष्यातील मैत्री ही निस्वार्थ, विश्वासू आणि धर्मनिष्ठ होती. रामाच्या मित्रप्रेमाची उदाहरणे आपल्याला रामायणामध्ये ठळकपणे दिसतात.
रामाच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मैत्री म्हणजे हनुमान यांच्याशी असलेली मैत्री. हनुमानजी हे रामाचे अनुपम दूत होते. हनुमानांनी सीतेच्या शोधासाठी जीव धोक्यात घातला, लंकेला जाऊन माहिती आणली आणि रामाच्या कार्यासाठी स्वतःला पूर्णतः समर्पित केले. याबदल्यात रामांनीही हनुमानावर अपार प्रेम आणि विश्वास दाखवला. राम म्हणत असत की “हनुमानांशिवाय माझे कार्य पूर्ण होणे अशक्य आहे.” आजही असं म्हणतात की जेथे रामकथा तेथे हनुमानजी असतात.
सुग्रीव यांच्याशी रामांनी केलेली मैत्रीही अत्यंत महत्त्वाची आहे. सुग्रीवाला त्याचा भाऊ वालीकडून अन्याय झाला होता. रामांनी त्याला न्याय मिळवून दिला आणि सुग्रीवानेही सीतेच्या शोधासाठी आपली संपूर्ण वानरसेना रामाला दिली. ही मैत्री परस्पर सहकार्य आणि विश्वासावर आधारित होती. सुग्रीवाने आपले मैत्रीचे बंध शेवटपर्यंत जोपासले.
रामाचे आणखी एक मित्र म्हणजे विभीषण. विभीषण हा रावणाचा भाऊ असूनही धर्माच्या बाजूने उभा राहिला. रामांनी त्याला आश्रय दिला आणि लंकेचा राजा बनवले. यातून रामांचे विशाल मन आणि मित्रावर ठेवलेला विश्वास दिसून येतो. तर रावणाच्या वधानंतर विभिषणाने अग्नी संस्कार देण्यास नकार दिला ते रामाने सांगितले तू करत नशील तर मी करेन.. मरणानंतर वैर संपते. यावरून शत्रूला आपला मानणारा राम होता.
रामाचे मित्रप्रेम आपल्याला शिकवते की खरी मैत्री ही स्वार्थावर आधारित नसून, ती निष्ठा, विश्वास आणि एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देण्यावर आधारित असते. आजच्या काळातही रामाचे हे मित्रप्रेम आपल्यासाठी एक आदर्श आहे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: रामायणात श्रीरामाने दाखवलेली मैत्री निस्वार्थी, विश्वासू आणि धर्मनिष्ठ होती. त्यांनी मित्रांसाठी संकटात साथ दिली आणि दिलेल्या वचनांचे पालन केले.
Ans: रामाचे प्रमुख मित्र होते – हनुमान, सुग्रीव, आणि विभीषण. हे मित्र विविध जाती व वर्गांचे असूनही रामाने त्यांना समान आदर दिला.
Ans: खरी मैत्री स्वार्थावर आधारित नसते; ती विश्वास, निष्ठा, संकटात साथ देणे आणि मित्राच्या सुख-दुःखात सहभागी होण्यावर आधारित असते. रामाचे मित्रप्रेम आजही आदर्श ठरते.






