फोटो सौजन्य: गुगल
हवामान खातं काय करतं तर सखोल अभ्यास करुन सांगतं की पावसाची स्थिती काय आहे. पण हा फक्त एक अंदाज असतो तो कधी खरा तर कधी खोटो होतो असा एकंदरितच समज आहे. पण एक गाव असं आहे ज्या गावातील मंदिर पाऊस पडणार की नाही हे अगदी अचूक सांगतं आणि या मंदिरावर इथल्या गावकऱ्यांचा प्रचंड विश्वास आहे. या मंदिरात रहस्य असं की, पावसाला सुरुवात होण्याआधी मंदिराच्या छतातून पाण्याचे थेंब टपकायला लागतात. एवढंच नाही तर या थेंबांच्या आकाराला देखील महत्व आहे बरं का ? पाण्याचे थेंब जेवढे मोठे तेवढा मुसळधार पाऊस पाण्याचे थेंब जर मध्यम आकाराचे असतील तर मध्यम स्वरुपाचा पाऊस आणि जर पाण्याचे थेंब छोटे असतील तर कमी पाऊस वर्षभरात होईल असा विश्वास या गावकऱ्यांना आहे. पण गुढ असं की, जेव्हा पावसाळा सुरु होतो तेव्हा या छतातून ना पाणी मंदिराच्या आतल्या बाजूला येत नाही. गाभारा पुर्णपणे कोरडा राहतो. हे मंदिर विज्ञानाला देखील एक आव्हान आहे. शास्त्रज्ञानांनी यावर खूप संशोधन केलं पण मंदिराच्या छताला कोणत्याही प्रकारच्या भेगा नाहीत त्यामुळे या मंदिरात कोडं अजूनतरी उलगडलेलं नाही.
हे मंदिर आहे कानपूच्या जगन्नाथाचं. या मंदिराचं पावित्र्य मोठं असल्याचं गावकरी सांगतात. या मंदिरात भगवान विष्णूच्या बारा अवतारांच्या मूर्ती आहेत ज्यात भविष्यातल्या कल्की अवताराची ही मूर्ती आहे. मंदिराच्या शिखरावर असलेल्या चक्रामुळे इथे कधीही वीज पडत नाही, असं स्थानिकांचं म्हणणं आहे. एकंदरित पाहता कानपूरचं हे मंदिर कित्येक काळाच रहस्य घेऊन उभं आहे. आजही या ठिकाण प्रत्येक गावकरी या मंदिराच्य़ा दैवी संकेतावरच सर्वात जास्त विश्वास ठेवतो.






