फोटो सौजन्य- pinterest
बेलाचे झाड आपल्या घरात लावणे शुभ आहे, कारण बेलाच्या झाडात त्रिदेव असतात. ब्रह्मा, महेश आणि विष्णू बेलाच्या मुळात ब्रह्मदेवाचा वास आहे, मध्यभागी विष्णू विराजमान आहेत आणि वरच्या बाजूला स्वतः महेश. बेलाचे झाड शिव स्वरूप आहे, केवळ त्याच्या दर्शनाने पापांचा नाश होतो. बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्यास सर्व तीर्थांना प्रदक्षिणा घातल्याचे पुण्य प्राप्त होते.
हिंदू धर्मशास्त्रानुसार, बेलाच्या झाडामुळे परिसर, शुद्ध पवित्र आणि आरोग्य संपन्न राहतो. तुळशीच्या झाडासारखे अनन्यसाधारण महत्त्व आहे. धर्मशास्त्रात असेही सांगितले आहे की बेलाच्या झाडाखाली शिव पार्वती अभिषेक, पूजा केल्यास अनुष्ठान केल्यास अथवा जप, तपश्चर्या केल्यास ते अधिक फलदायी ठरते. बेलाच्या झाडा खालून प्रेत गेल्यास त्या व्यक्तीस मोक्ष मिळतो. एखाद्या व्यक्तीने बेलाचे झाड लावले, त्याचे संगोपन, संवर्धन केल्यास, त्या व्यक्तीस एक कोटी शिवालय बांधल्याचे पुण्य प्राप्त होते, असे पुराणात सांगितले आहे.
बेलपत्राला भगवान शिव शंकराच्या पूजेमध्ये विशेष महत्त्व आहे. एक बेलपत्र अर्पण केल्यानेही महादेव प्रसन्न होतात, म्हणून त्यांना आशुतोष देखील म्हणतात. बेलपत्र तसेच श्रीफळ म्हणून ओळखले जाणारे हे फळ खूप उपयुक्त आहे. ज्या झाडावर ते येते त्याला शिवद्रुम असेही म्हणतात. बेल वृक्ष समृद्धीचे प्रतीक आहे, अत्यंत पवित्र आणि समृद्धी देणारे आहे.
शिवपुराणानुसार, श्रावण महिन्यात सोमवारी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने एक कोटी कन्यादान पुण्य लाभते. बेलपत्राने शिवलिंगाची पूजा केल्यास गरिबी दूर होते आणि सौभाग्य लाभते. शिवपुराणानुसार बेलवृक्ष लावून संपूर्ण कुटुंब विविध पापांच्या प्रभावापासून मुक्त होते. ज्या ठिकाणी बेलवृक्ष आढळतात त्या स्थानास काशी तिर्थांप्रमाणे पूजनीय आणि पवित्र मानले जाते. अशा ठिकाणी उपासना केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते. बेलपत्र शंकरांचा आहार मानली जातात, म्हणून भक्त त्यांना मोठ्या श्रद्धेने महादेवांना अर्पण करतात. शिवपूजनासाठी बेल पत्र खूप महत्त्वाचा मानला जातो.
शिवलिंगावर बेल पत्र अर्पण करुन महादेव लगेच प्रसन्न होतात. असे मानले जाते की बेलपात्रांशिवाय भगवान शिवची पूजा पूर्ण होत नाही. परंतु बेलपात्रात फक्त तीन पाने असणे आवश्यक आहे तरच ते बेलपत्र शिवलिंगावर चढवण्यास पात्र आहेत.
बेलपत्र भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे. भांग, धोतऱ्याचे फूल आणि बेलपत्राने प्रसन्न होणारे महादेव हे एकमेव देव आहेत. शिवरात्रानिमित्त बेल पत्रांतून शिवजींची केवळ पूजन केले जाते. तीन पाने असलेली बेलपत्रे सहज उपलब्ध होते, परंतु असे काही बेलपत्र आहेत. खरंतर, बेलपत्र आपल्यासाठी उपयुक्त वनस्पती आहे. हे आपले दु:ख दूर करते.
त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं च त्रिधायुतम्।
त्रिजन्मपापसंहारं बिल्वपत्रं शिवार्पणम्॥
अर्थ: तीन गुण, तीन डोळे, त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे, हे भगवान शिव, मी तुम्हाला तीन पानाचे बेल पत्र अर्पण करत आहे.
ते बोलता न आल्यास
ओम् नमः शिवाय
नमः शिवाय
शिवाय नमः
हर हर महादेव
या मंत्रांचा जप करून अर्पण करावे.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: धार्मिक मान्यतानुसार बेलपत्रात त्रिदेवांचा वास असतो आणि ते अत्यंत पवित्र मानले जाते. त्यामुळे भगवान शिव यांना बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते.
Ans: बेलपत्राशिवाय शिवपूजा अपूर्ण मानली जाते. श्रद्धेनुसार बेलपत्र अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात.
Ans: बेलवृक्षाला शिवस्वरूप मानले जाते आणि त्याच्या दर्शनानेही पापांचा नाश होतो, अशी श्रद्धा आहे.






