(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
उर्दु साहित्यातील सर्वात प्रभावशाली, वादग्रस्त आणि वास्तववादी लेखकांपैकी एक म्हणजे सआदत हसन मंटो यांचा आज जन्मदिवस आहे. त्यांनी मानवी स्वभाव, समाजातील ढोंगीपणा, लैंगिकता, हिंसा आणि फाळणीच्या वेदना यांचे निर्भीड चित्रण केले. त्यांनी २०० हून अधिक कथा, नाटके, निबंध, रेडिओ पटकथा आणि चित्रपटांसाठी संवादलेखन केले आहे. १९४७ची भारत-पाकिस्तान फाळणीवर लिहिलेल्या त्यांच्या कथा काळजाला भिडणाऱ्या होत्या. यात त्यांनी फाळणीतील हिंसा, स्थलांतर आणि मानवी शोकांतिका अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. याशिवाय टोबा टेक सिंह, ठंडा गोश्त, खोल दो आणि बू या कथा विशेष गाजल्या असून आजही लोकांच्या पसंतीस पडतात. त्यांच्या साहित्यावर चित्रपट, नाटके आणि संशोधनही झाले आहे.
11 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
11 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






