• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Chhatrapati Shivaji Maharajs Legacy Offers Timeless Lessons In War And Governance Nrhp

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : रणसंग्राम ते राज्यकारभार… महाराजांचे ‘हे’ जीवनधडे म्हणजे अमूल्य वारसाच

भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एक अजरामर नाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि मुघलांच्या अन्यायाला तोंड देण्याचे सामर्थ्य मराठ्यांनी मिळवले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 19, 2025 | 09:52 AM
Chhatrapati Shivaji Maharaj's legacy offers timeless lessons in war and governance

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : रणसंग्राम ते राज्यकारभार... महाराजांचे 'हे' जीवनधडे म्हणजे अमूल्य वारसाच ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एक अजरामर नाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि मुघलांच्या अन्यायाला तोंड देण्याचे सामर्थ्य मराठ्यांनी मिळवले. केवळ एक योद्धा नव्हे, तर आदर्श राजा, कुशल व्यवस्थापक आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता म्हणून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे धडे तरुण पिढीने शिकले पाहिजेत.

संस्कृती आणि मातृभाषेचा सन्मान

शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारात मराठी आणि संस्कृत भाषांना अधिकृत स्थान दिले. त्या काळात फारसीचा प्रभाव प्रचंड होता, पण राजांनी मातृभाषेला महत्त्व देत लोकांशी थेट संवाद साधण्यास प्रोत्साहन दिले. यातून आपली संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखण्याचा मूलभूत संदेश मिळतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेच्या मदतीनंतरही इराणला पराभूत करणे इस्रायलसाठी मोठे दिव्यच; जिंकणार कोण?

धैर्य, सावधगिरी आणि नेतृत्व कौशल्य

प्रतापगडच्या लढाईत अफझल खानाच्या कपटी योजनेला ओळखून महाराजांनी चाणाक्षपणे विजय मिळवला. अफझल खानाने शांतता चर्चेच्या बहाण्याने शिवाजी महाराजांना मारण्याचा कट रचला होता, पण त्यांनी आपल्या शौर्याने आणि रणनितीने त्याचा पराभव केला. योग्य वेळी योग्य व्यक्तीला जबाबदारी देणे, हे नेतृत्वाचे धडे यातून शिकायला मिळतात.

आत्मविश्वास आणि धैर्य महत्त्वाचे

जेव्हा औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद केले, तेव्हा ते तीन महिने नजरकैदेत होते. पण त्यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी संयम आणि आत्मविश्वास बाळगला. नियोजनबद्ध युक्तीने आणि धैर्याने ते त्यातून सहीसलामत बाहेर पडले. यातून संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य, संयम आणि आत्मविश्वास यांचा महत्त्वाचा धडा मिळतो.

नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि संरक्षण यंत्रणा

भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांनी किनारपट्टीवरील संरक्षण बळकट करण्यासाठी किल्ले आणि नौदल उभारले. समुद्रावरील धोक्यांना तोंड देण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनीतीचा अवलंब केला. यामुळे नाविन्यपूर्ण विचारसरणी कशी महत्त्वाची असते, हे शिकायला मिळते.

महिलांचा आदर आणि संरक्षण

शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान राखण्यासाठी कठोर नियम आखले. कुठल्याही प्रकारचा महिलांवरील अत्याचार खपवून घेतला जात नव्हता. त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांनी कठोर दंड संहिता अमलात आणली. आजच्या काळातही हा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे.

राजकीय चातुर्य आणि युद्धनीती

मुघल साम्राज्याशी संघर्ष करताना महाराजांनी प्रत्यक्ष लढाईसह राजकीय युक्त्या वापरल्या. गनिमी कावा, चर्चेच्या माध्यमातून वेळ मिळवणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ही त्यांची रणनीती होती. भगवद्गीता आणि चाणक्य नीतीचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळेच ते पराक्रमी असूनही केवळ बळावर नव्हे, तर बुद्धिमत्तेनेही युद्ध जिंकले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतावर धोका! अंतराळातून होऊ शकतो भयानक विध्वंस, नासाने दिला लघुग्रह ‘2024 YR4’ बाबत इशारा

शिवाजी महाराजांचे विचार आजही मार्गदर्शक

शिवाजी महाराजांचा संघर्ष हा केवळ स्वराज्यासाठी नव्हता, तर तो एक आदर्श समाजव्यवस्थेची उभारणी करण्यासाठी होता. आजच्या पिढीने त्यांच्या शिकवणींमधून नीतिमत्ता, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा, धैर्य आणि न्यायप्रियता शिकली पाहिजे. त्यांच्या विचारांवर चालणारे युवकच भारताला पुढे नेऊ शकतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे एका महान शौर्यगाथेसारखे आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात सत्य, निष्ठा आणि धैर्याचा अवलंब करावा.

Web Title: Chhatrapati shivaji maharajs legacy offers timeless lessons in war and governance nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
  • shivjayanti

ताज्या बातम्या

पुढे वाचा
धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर सातत्याने अत्याचार; पीडिता गर्भवती होताच…

Nov 18, 2025 | 09:04 AM
जागतिक स्तरावर बाल लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्याचा दिवस; जाणून घ्या याचे महत्त्व आणि यंदाची थीम

जागतिक स्तरावर बाल लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्याचा दिवस; जाणून घ्या याचे महत्त्व आणि यंदाची थीम

Nov 18, 2025 | 08:59 AM
Top Marathi News Today Live: दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त

LIVE
Top Marathi News Today Live: दिल्ली स्फोटप्रकरणातील मोठी अपडेट; 68 मोबाईल जप्त

Nov 18, 2025 | 08:54 AM
Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित

Ashes 2025 : कोण होणार चॅम्पियन? मायकेल वॉनने अ‍ॅशेस मालिकेबद्दल केली भविष्यवाणी! क्रिकेट जगतही झाले आश्चर्यचकित

Nov 18, 2025 | 08:53 AM
PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

Nov 18, 2025 | 08:46 AM
Uttar Pradesh Crime: धक्कदायक! जुगारात पत्नी “हरली”; सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार

Uttar Pradesh Crime: धक्कदायक! जुगारात पत्नी “हरली”; सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार

Nov 18, 2025 | 08:46 AM
Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय

Free Fire Max: बॅटग्राऊंड प्लेअर्स इकडे लक्ष द्या! गेम खेळताना फॉलो करा या स्मार्ट Tips, प्रत्येक मॅचमध्ये मिळेल विजय

Nov 18, 2025 | 08:45 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 17, 2025 | 07:32 PM
Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Raigad News : रोह्यात वनश्री शेडगे राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

Nov 17, 2025 | 07:24 PM
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.