• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Chhatrapati Shivaji Maharajs Legacy Offers Timeless Lessons In War And Governance Nrhp

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : रणसंग्राम ते राज्यकारभार… महाराजांचे ‘हे’ जीवनधडे म्हणजे अमूल्य वारसाच

भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एक अजरामर नाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि मुघलांच्या अन्यायाला तोंड देण्याचे सामर्थ्य मराठ्यांनी मिळवले.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Feb 19, 2025 | 09:52 AM
Chhatrapati Shivaji Maharaj's legacy offers timeless lessons in war and governance

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : रणसंग्राम ते राज्यकारभार... महाराजांचे 'हे' जीवनधडे म्हणजे अमूल्य वारसाच ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti : भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज हे एक अजरामर नाव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आणि मुघलांच्या अन्यायाला तोंड देण्याचे सामर्थ्य मराठ्यांनी मिळवले. केवळ एक योद्धा नव्हे, तर आदर्श राजा, कुशल व्यवस्थापक आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कर्ता म्हणून त्यांचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाचे धडे तरुण पिढीने शिकले पाहिजेत.

संस्कृती आणि मातृभाषेचा सन्मान

शिवाजी महाराजांनी आपल्या दरबारात मराठी आणि संस्कृत भाषांना अधिकृत स्थान दिले. त्या काळात फारसीचा प्रभाव प्रचंड होता, पण राजांनी मातृभाषेला महत्त्व देत लोकांशी थेट संवाद साधण्यास प्रोत्साहन दिले. यातून आपली संस्कृती आणि भाषेचा सन्मान राखण्याचा मूलभूत संदेश मिळतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेच्या मदतीनंतरही इराणला पराभूत करणे इस्रायलसाठी मोठे दिव्यच; जिंकणार कोण?

धैर्य, सावधगिरी आणि नेतृत्व कौशल्य

प्रतापगडच्या लढाईत अफझल खानाच्या कपटी योजनेला ओळखून महाराजांनी चाणाक्षपणे विजय मिळवला. अफझल खानाने शांतता चर्चेच्या बहाण्याने शिवाजी महाराजांना मारण्याचा कट रचला होता, पण त्यांनी आपल्या शौर्याने आणि रणनितीने त्याचा पराभव केला. योग्य वेळी योग्य व्यक्तीला जबाबदारी देणे, हे नेतृत्वाचे धडे यातून शिकायला मिळतात.

आत्मविश्वास आणि धैर्य महत्त्वाचे

जेव्हा औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यात कैद केले, तेव्हा ते तीन महिने नजरकैदेत होते. पण त्यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी संयम आणि आत्मविश्वास बाळगला. नियोजनबद्ध युक्तीने आणि धैर्याने ते त्यातून सहीसलामत बाहेर पडले. यातून संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य, संयम आणि आत्मविश्वास यांचा महत्त्वाचा धडा मिळतो.

नाविन्यपूर्ण दृष्टीकोन आणि संरक्षण यंत्रणा

भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांनी किनारपट्टीवरील संरक्षण बळकट करण्यासाठी किल्ले आणि नौदल उभारले. समुद्रावरील धोक्यांना तोंड देण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि युद्धनीतीचा अवलंब केला. यामुळे नाविन्यपूर्ण विचारसरणी कशी महत्त्वाची असते, हे शिकायला मिळते.

महिलांचा आदर आणि संरक्षण

शिवाजी महाराजांनी महिलांचा सन्मान राखण्यासाठी कठोर नियम आखले. कुठल्याही प्रकारचा महिलांवरील अत्याचार खपवून घेतला जात नव्हता. त्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी त्यांनी कठोर दंड संहिता अमलात आणली. आजच्या काळातही हा धडा अत्यंत महत्त्वाचा आहे.

राजकीय चातुर्य आणि युद्धनीती

मुघल साम्राज्याशी संघर्ष करताना महाराजांनी प्रत्यक्ष लढाईसह राजकीय युक्त्या वापरल्या. गनिमी कावा, चर्चेच्या माध्यमातून वेळ मिळवणे आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेणे ही त्यांची रणनीती होती. भगवद्गीता आणि चाणक्य नीतीचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यामुळेच ते पराक्रमी असूनही केवळ बळावर नव्हे, तर बुद्धिमत्तेनेही युद्ध जिंकले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतावर धोका! अंतराळातून होऊ शकतो भयानक विध्वंस, नासाने दिला लघुग्रह ‘2024 YR4’ बाबत इशारा

शिवाजी महाराजांचे विचार आजही मार्गदर्शक

शिवाजी महाराजांचा संघर्ष हा केवळ स्वराज्यासाठी नव्हता, तर तो एक आदर्श समाजव्यवस्थेची उभारणी करण्यासाठी होता. आजच्या पिढीने त्यांच्या शिकवणींमधून नीतिमत्ता, नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा, धैर्य आणि न्यायप्रियता शिकली पाहिजे. त्यांच्या विचारांवर चालणारे युवकच भारताला पुढे नेऊ शकतील. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे एका महान शौर्यगाथेसारखे आहे. त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात सत्य, निष्ठा आणि धैर्याचा अवलंब करावा.

Web Title: Chhatrapati shivaji maharajs legacy offers timeless lessons in war and governance nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 09:52 AM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti
  • shivjayanti

संबंधित बातम्या

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!
1

‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमात महेश मांजरेकर साकारणार कधीही न साकारलेली भूमिका… जोरदार चर्चा!

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!
2

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली
3

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५२ वा द्वितीय राज्याभिषेक सोहळा संपन्न; संभाजी ब्रिगेडने ‘रयतेच्या राज्या’ची भावना जपली

Kalyan News :  इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन
4

Kalyan News : इतिहासप्रेमींसाठी पर्वणी; गणेशोत्सावाच्या निमित्ताने शहरात शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

विकेंड ट्रीपला जात आहात? मग टेन्शन फ्री सफरसाठी बॅगेत या 5 गोष्टी ठेवायला विसरू नका

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

‘…हम सुधर गए और आप बिगड़ गए!’ पंकज त्रिपाठींना गुरुजी म्हणत रणवीर सिंहने का केली अशी कमेंट?

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

अरेच्चा! ‘या’ दुचाकी उत्पादक कंपनीने स्वतःचाच रेकॉर्ड तोडला, पहिल्यादाच एका महिन्यात विक्री 1 लाखांच्या पार

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Ratnagiri News : चिपळूण नागरीतर्फे नवरात्रोत्सवनिमित्त ‘नवदुर्गा सुयश ठेव’ योजनेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

व्हिडिओ

पुढे बघा
Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.