वातावरणाच्या वरच्या थरात Ozoneची ७० टक्क्यांनी वाढ आयआयटीएमचे संशोधनातून समोर आले (फोटो - istock)
सुनयना सोनवणे : पुणे : हवामान बदल आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटात आता आणखी एका गंभीर धोक्याची भर पडली आहे. पावसाळ्याच्या म्हणजेच आशियाई ग्रीष्मकालीन मान्सूनच्या काळात वातावरणाच्या वरच्या थरातील ओझोन वायूचे प्रमाण गेल्या १५० वर्षांत तब्बल ७० टक्क्यांनी वाढल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हा अतिरिक्त ओझोन हरितगृह वायूप्रमाणे काम करत असून सूर्याची उष्णता वरच्या वातावरणात अडकवून ठेवत आहे. त्यामुळे भारतीय उपखंडातील तापमानवाढ अधिक तीव्र होत असल्याचा निष्कर्ष पुण्यातील ‘भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थे’च्या (आयआयटीएम) नव्या संशोधनातून पुढे आला आहे.
आयआयटीएमचे संशोधक चैत्री रॉय, अनुप एस. महाजन, डी. सी. अवंतिका, सचिन घुडे आणि गौरव गोवर्धन यांनी हे महत्त्वाचे संशोधन केले आहे. नुकतेच हे संशोधन ‘जेजीआर ॲटमॉस्फिअर’ या आंतरराष्ट्रीय विज्ञान शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहे. जमिनीलगत असलेला ओझोन हा आरोग्यासाठी घातक प्रदूषक असतो, तर वरच्या थरातील ओझोन सूर्याची किरणे नियंत्रित करण्याचे महत्त्वाचे काम करतो. मात्र, वाढता मानवी हस्तक्षेप आणि जीवाश्म इंधनांच्या अफाट वापरामुळे या नैसर्गिक समतोलाला धक्का बसला आहे.
हे देखील वाचा : Heat strokeपासून संरक्षण आवश्यक! उन्हामध्ये आरोग्याची कशी घ्यावी काळजी, तज्ज्ञांचे मत काय?
ओझोन हा वायू जमिनीच्या जवळ असताना प्रदूषक मानला जातो आणि श्वसनविकारांसाठी घातक ठरतो. मात्र वातावरणाच्या वरच्या थरात तो उष्णता अडवून ठेवण्याचे काम करतो. त्यामुळे तो हरितगृह वायूप्रमाणे पृथ्वीचे तापमान वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेषतः १० ते १५ किलोमीटर उंचीवरील वातावरणात त्याचा परिणाम अधिक गंभीर ठरतो.
संशोधनानुसार, मान्सूनच्या काळात वाहनांचा धूर, उद्योग, कोळसा आणि पेट्रोलियम इंधन जाळल्यामुळे तयार होणारे नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन मोनॉक्साईड यांसारखे प्रदूषक ढगांच्या तीव्र उर्ध्वगामी हालचालीमुळे वरच्या वातावरणात पोहोचतात. या प्रक्रियेला ‘कन्वेक्टिव्ह ट्रान्सपोर्ट’ किंवा अभिसरण वहन असे म्हटले जाते. हीच प्रदूषके वरच्या वातावरणात ओझोनची निर्मिती वाढवतात आणि त्यामुळे उष्णता अधिक प्रमाणात अडकून राहते.
हे देखील वाचा : Smart Meterवरुन उत्तर प्रदेशमध्ये वादंग! CM योगी आदित्यनाथ यांचे चौकशीचे आदेश
तातडीच्या उपाययोजनांची गरज –
संशोधकांच्या मते, आता केवळ कार्बन डायऑक्साइड कमी करण्यावर भर देऊन चालणार नाही. नायट्रोजन ऑक्साईड्स आणि कार्बन मोनॉक्साईडसारख्या प्रदूषकांचे उत्सर्जनही तातडीने कमी करणे आवश्यक आहे. यासाठी कठोर पर्यावरणीय धोरणे राबवली नाहीत, तर भविष्यात तापमानवाढ, मान्सूनचा बदलता स्वभाव आणि हवामान संकट अधिक तीव्र होऊ शकते.
संशोधनातील निष्कर्ष –






