सूर्यकुमार यादव (फोटो- ians)
आयपीएल सूर्यकुमार यादवने केली निराशाजनक कामगिरी
मुंबई टी-20 लीग मध्येही सूर्यकुमार यादवची निराशा
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात जिंकला टी-20 वर्ल्ड कप
Mumbai T-20 league: सूर्यकुमार यादव हा भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आहे. क्रिकेट विश्वात त्याची मिस्टर 360 अशी ओळख आहे. सध्या सूर्यकुमार यादव आपल्या खराब फॉर्ममध्ये जात असल्याचे पाहायला मिळत आहे. आयपीएल 2026 मध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. आता त्यापाठोपाठ लोकल क्रिकेटमध्ये देखील त्याची बॅट शांत असल्याचे दिसून येत आहे.
सूर्यकुमार यादव हा भारतीय टी 20 संघाचा कर्णधार असून, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकचा प्रमुख फलंदाज देखील आहे. त्याच्या नेतृत्वात भारताने टी 20 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे. मात्र सध्या तो आपल्या फॉर्मसाथी झगडत असल्याचे दिसून येत आहे.आयपीएल 2026 मध्ये सूर्यकुमार यादवची बॅट शांत राहिल्याचे दिसून आले. त्याला केवळ 270 रन्स करता आल्या. या खराब कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सलाही यंदाच्या गुणतालिकेत खालच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
त्यानंतर सूर्यकुमार यादव आयपीएलचे अपयश धुवून काढण्यासाठी मुंबई टी 20 लीगमधून खेळत आहे. मात्र तिथेही त्याला अपयश आले आहे. केवळ 19 रन्स करून तो आउट झाला आहे. त्यामुळे आता त्याक फॉर्म कधी परत येणार असा प्रश्न निवड समिती आणि चाहत्यांना पडला आहे.
क्रिकेटविश्व हादरलं! Asian Games 2026 टीम इंडियाचे खेळाडू जाहीर? मात्र Suryakumar Yadav ला झटका
Suryakumar Yadav ला झटका
या वर्षी 19 सप्टेंबरपासून जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होणार आहे. यासाठी बीसीसीआयने संभाव्य खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. मात्र या टीममध्ये सूर्यकुमार यादवला स्थान देण्यात आलेले नाही. म्हणजेच या संघाचे सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून नेतृत्व करताना दिसून येणार नाहीये. त्यामुळे आशियाई खेळात सूर्याची कप्तानी आणि आक्रमक फलंदाजी चाहत्यांना पाहता येणार नाही.
“मी आता आणखी मोठ्या प्रवासाला…”; Suryakumar Yadav च्या ट्विटमुळे क्रिकेटविश्वात एकच खळबळ
बीसीसीआयने 30 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे. बीसीसीआय भविष्यातील स्टार खेळाडू म्हणून वैभवकडे पाहत असून, जपानच्या मैदानावर त्याला आंतरराष्ट्रीय मंचावर चमकण्याची मोठी संधी मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये शानदार खेळी केली आहे. त्यामुळे वैभवला स्थान देण्यात आल्याचे म्हटले जात आहे. भारताचे माजी दिग्गज फलंदाज आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही व्ही. एस लक्ष्मण हे आशियाई गेम्समध्ये भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस 30 पैकी खेळाडूंचा मुख्य संघ जाहीर केला जाऊ शकतो.






