(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
भारतासाठी धोक्याची घंटा! बांगलादेशनंतर आता म्यानमारमध्ये पाकिस्तानचा घाट; चीनही देतोय साथ
रशियाच्या (Russia) परराष्ट्र मंत्रालयाला पाकिस्तानच्या भारत आणि अफगाणिस्तानमदील तणाव कमी करण्याच्या मध्यस्थीच्या भूमिकेवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रशियाने उत्तर देक यावादांमध्ये मध्यस्थी करण्यास नकार दिला. तसेच या देशांनी विनंती केली तर आम्ही त्यांच्या कोणतेही मतभेद सोडवण्यासाठी तयार असल्याचे म्हटले. तसेच भारत आणि पाकिस्तान वाद द्विपक्षीय संवादातून सोडवण्याचा सल्लाहा रशियाने दिला.
भारताला रशियाचा जागतिक स्तरावर राजनैतिक पाठिंबा मिळणे हे अत्यंत महत्वाचे मानले जात आहे. यामुळे पाकिस्तानला एक कडक संदेश जातो की, मदतीसाठी इतर देशांकडे हात पसरण्यापेक्षी संवादाद्वारे तणाव सोडवावा. तसेच भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर द्विपक्षीय भूमिकाही वाढते.
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून वाद आहे. १९७२ च्या शिमला आणि १९९९ च्या लाहोर घोषणांमुळे दोन्ही देशांत वाद सुरु आहे. रशियाने हा वाद द्विपक्षीय संवादानेच सोडवला गेला पाहिजे असे म्हटले आहे. पाकिस्तान आतापर्यंत अनेकदा जागतिक पातळीवर या वादात मध्यस्थीसाठी जगभरातील देशांची मदत मागितीली आहे. यासाठी अनेक महत्वाच्या बैठकाही घेण्यात आल्या आहेत. पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रामध्ये देखील काश्मीर मुद्दांवर मदत मागितली होती. परंतु भारताने हा वाद भारत-पाकिस्तानचा वाद असल्याचे त्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या देशाची भूमिका स्वीकारली जाणार नाही हे स्पष्ट केले आहे. तसेच पहलगाम हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तानमध्ये वाद वाढला आहे. भारताने सिंधू जल करार स्थगित केल्याने देखील पाकिस्तान नाराज आहे.
रशिया आणि पाकिस्तानमध्ये व्यापार, आर्थिक, वैज्ञानिक आणि तांत्रिक सहकार्यावर संबंध प्रस्थापित आहेत. दोन्ही देशांमध्ये या क्षेत्रांमध्ये २०३० पर्यंत विकास होण्याचा करार मंजूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच पाकिस्तान रशियन तेल आणि वायू प्रकल्पांमध्ये सहभाग घेऊन देशांतर्गत ऊर्जा पुरवठा वाढवण्याचाही प्रयत्न करत आहे. परंतु रशियाचे भारताशी सोव्हिएत काळापासून मजबूत संबंध आहे. भारता हा रशियाचा सर्वात मोठा तेल व्यापारी भागीदार आहे. यामुळे भारताला रशियाचा पाठिंबा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
Modi-Putin जोडीचा नवा धमका! रशियाचं ‘सुपर वेपन’ आता भारतात तयार होणार, अमेरिकेचा जळफळाट
Ans: भारत-पाकिस्तान वाद हा द्विपक्षीय वाद असल्याने रशियाने यामध्ये मध्यस्थीसाठी नकार दिला आहे.
Ans: रशियाने पाकिस्तानला भारतासोबतचा वाद द्विपक्षीय संवादातून सोडवण्याचा सल्ला दिला आहे.
Ans: रशियाने भारत-पाकिस्तान वादात मध्यस्थीसाठी नकार दिला आहे. यामुळे भारताच्या द्विपक्षीय भूमिकेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळेल,






