• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • World Water Days March Date Holds A Special Reason Discovery Shocks The World Nrhp

World Water Day 2025 : ‘पाणी हेच जीवन!’ वाचा कसे करू शकतो मानव ‘या’ जलसंकटाचा सामना?

World Water Day 2025 : २२ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर जागरूकता निर्माण केली जाते.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 22, 2025 | 09:02 AM
World Water Day's March date holds a special reason discovery shocks the world

World Water Day : 'पाणी हेच जीवन!' वाचा कसे करू शकतो मानव 'या' जलसंकटाचा सामना? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

World Water Day 2025 : २२ मार्च हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिवशी पाण्याचे महत्त्व, त्याचे संवर्धन आणि संभाव्य जलसंकटांवर उपाय यावर जागरूकता निर्माण केली जाते. पाणी हे पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान नैसर्गिक साधन असून, त्याचे योग्य प्रकारे व्यवस्थापन करणे आणि वापराचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाणी – जीवनाचा मूलभूत आधार

पृथ्वीच्या ७१ टक्के भागावर पाणी आहे, मात्र त्यातील केवळ ३ टक्के पाणीच पिण्यायोग्य आहे. सध्या, अनेक देश आणि भागांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. जलप्रदूषण आणि पाण्याचा अतिवापर यामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी हा सर्वांत महत्त्वाचा आणि दुर्मिळ संसाधन ठरू शकतो.

जागतिक जल दिनाचा इतिहास

१९९२ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे पर्यावरण आणि विकास परिषद आयोजित केली. त्याचवेळी जागतिक जल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. २२ मार्च १९९३ रोजी प्रथमच हा दिवस जगभरात पाळला गेला आणि तेव्हापासून दरवर्षी याच दिवशी पाण्याचे महत्त्व लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. २०१० मध्ये, संयुक्त राष्ट्रसंघाने सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी व स्वच्छता याला मानवी हक्क म्हणून घोषित केले. यामुळे प्रत्येक व्यक्तीला शुद्ध पाणी मिळणे हा मूलभूत अधिकार ठरला.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ॲमेझॉनच्या जंगलात सापडला पृथ्वीवरील सर्वात लांब ॲनाकोंडा; शास्त्रज्ञांच्या ‘या’ शोधाने जग हादरले

जागतिक जल दिन २०२५ ची थीम – हिमनदी संवर्धन

प्रत्येक वर्षी जागतिक जल दिनासाठी एक विशिष्ट थीम ठरवली जाते, जी त्या वर्षातील पाणीविषयक सर्वांत महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकते. २०२५ साठीची अधिकृत थीम “हिमनदी संवर्धन” आहे. हिमनद्या म्हणजे पृथ्वीवरील सर्वांत मोठ्या पाण्याच्या साठ्यांपैकी एक. या हिमनद्या गोड्या पाण्याचा मुख्य स्रोत आहेत आणि त्या नद्यांना, तलावांना आणि संपूर्ण परिसंस्थेला आवश्यक पाणी पुरवतात. मात्र, जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत, त्यामुळे भविष्यात जलसंकट निर्माण होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व

पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे, म्हणूनच ‘पाणी हेच जीवन’ असे म्हटले जाते. आजच्या घडीला अनेक ठिकाणी जलसंकट निर्माण झाले आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण आणि पाण्याचा अपव्यय यामुळे शुद्ध पाण्याच्या स्त्रोतांवर प्रचंड ताण येत आहे. तज्ञांच्या मते, बहुतेक लोक पाण्याचा गैरवापर करताना त्याचे परिणाम लक्षात घेत नाहीत. अंघोळ, कपडे धुणे, वाहने धुणे आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर केला जातो. मात्र, यातील बऱ्याच बाबतीत पाण्याचा अनावश्यक अपव्यय केला जातो, जो रोखणे अत्यावश्यक आहे.

जागतिक जल दिन साजरा करण्यामागचा उद्देश

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हा दिवस साजरा करण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे –
पाण्याचा अपव्यय रोखणे
सर्वसामान्यांना शुद्ध पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे
‘पाणी वाचवा’ अभियान प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणे
जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखणे

आपण काय करू शकतो?

१. पाणी जपून वापरा: गरजेपुरतेच पाणी वापरण्याची सवय लावा.
2. पुनर्वापराचा विचार करा: पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल, यावर भर द्या.
3. जलसंवर्धन प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा: पावसाचे पाणी साठवण्याच्या योजना राबवा.
4. प्रदूषण टाळा: जलप्रदूषण रोखण्यासाठी जबाबदारीने वर्तन करा.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : जगभरातील आनंदी देशांची यादी जाहीर; भारत कोणत्या क्रमांकावर?

जलसंकट

जागतिक जल दिन केवळ एक साधा वार्षिक उपक्रम नसून, तो एक गंभीर विषय आहे. भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी आजच पाण्याच्या संवर्धनावर भर देणे आवश्यक आहे. हिमनदी संवर्धनासारख्या उपक्रमांमध्ये योगदान देऊन आपण पृथ्वीच्या भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलू शकतो. त्यामुळे पाणी वाचवणे ही फक्त सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने त्यात सहभाग घ्यायला हवा.

“आज पाणी वाचवा, उद्या जीवन वाचेल!”

Web Title: World water days march date holds a special reason discovery shocks the world nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • Water problem
  • Water storage
  • Water supply

संबंधित बातम्या

कोयना धरणांतर्गत पावसाचा जोर वाढला; धरणात 76.81 टीएमसी पाणीसाठा
1

कोयना धरणांतर्गत पावसाचा जोर वाढला; धरणात 76.81 टीएमसी पाणीसाठा

‘इथं’ चक्क बोअरवेलमधून निघतंय उकळतं पाणी; परिसरात चर्चांना उधाण
2

‘इथं’ चक्क बोअरवेलमधून निघतंय उकळतं पाणी; परिसरात चर्चांना उधाण

कोल्हापूरच्या धरणांतील पाणीसाठा वाढतोय; राधानगरी 65 तर वारणा धरण 70 टक्के भरले
3

कोल्हापूरच्या धरणांतील पाणीसाठा वाढतोय; राधानगरी 65 तर वारणा धरण 70 टक्के भरले

Thane News :  ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणीकपात
4

Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणीकपात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Mahrashtra Politics: ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्याने BMC चे समीकरणे बदलतील का? मनसेमुळे उबाठाला काय होईल फायदा?

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

Breaking News: दहीहंडीच्या सणात विरजण! दोरी बांधायला गेला अन्…; मुंबईत गोविंदाचा दुर्दैवी अंत

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

The Bengal Files: ‘काश्मीरची परिस्थिती बंगालपेक्षा चांगली…’ ‘द बंगाल फाइल्स’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, पल्लवी जोशी संतापल्या!

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Tata Safari, Innova ला डच्चू देत ‘या’ 7 सीटर कारने जुलै 2025 गाजवला, ताबडतोड झाली विक्री

Tata Safari, Innova ला डच्चू देत ‘या’ 7 सीटर कारने जुलै 2025 गाजवला, ताबडतोड झाली विक्री

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..

व्हिडिओ

पुढे बघा
Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Kalyan : डोंबिवलीत भाजपा आणि ओम गणपती मित्र मंडळातर्फे भव्य दहीहंडी उत्सव

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Navi Mumbai : फाळणीच्या वेदना आठवत वाशीमध्ये मूक रॅली

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Ambernath : अग्नीशमन सेवेत मोलाचे योगदान; भागवत सोनोनेंना राष्ट्रपती अग्निशमन सेवा पदक जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.