महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार 'राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा' (Photo Credit- X)
चीन मधील शांघाय येथे या वर्षी जागतिक कौशल्य स्पर्धा होणार आहेत. या अनुषंगाने केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालय आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात इंडिया स्किल राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. गांधीनगर येथे पश्चिम क्षेत्र विभागाच्या प्रमुख फेरी स्पर्धा होत असून यात मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यातील ३०० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. यात महाराष्ट्रातील ११७ विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. यापुढील स्पर्धा नोएडा येथे होणार असून त्यानांनातर अंतिम स्पर्धक चीन मधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
गांधीनगर इंडिया स्किल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात राज्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. कौशल्य स्पर्धेचे हे व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उज्जवल भविष्याची दिशा देणारे ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आदरणीय प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदीजी २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या नंतर त्यांनी कौशल्य विकासाकडे लक्ष केंद्रित केले. राज्यातील तरुणांना आणि विविध संस्थांमधील प्रशिक्षक यांना जगभरातल्या विविध भागात केवळ कौशल्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यासाठी पाठवले. त्यांच्या दूरदृष्टीने आज भारताच्या विकासात कौशल्य विकासाचे योगदान स्पष्ट झाले आहे.
चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन
प्रधानमंत्री श्री मोदीजी यांनी ‘ पीएम सेतू ‘ योजना सुरू करून देशभरातील कौशल्य विकासाची गती वाढवली आहे. मोदीजी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला असून ही यात कौशल्य विभागाचे मोठे योगदान ठरणार आहे. तसेच महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्यात विविध योजना यशस्वीरित्या राबवण्यात येत असून त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात कौशल्य विकासाचे कॅपिटल म्हणून उदयास येत असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी काढले. भारत हा तरुणांना देश असून युवा शक्ती हीच विकसित भारताच्या संकल्पनेतील केंद्र बिंदू असून याच आधारावर आदरणीय प्रधानमंत्री कौशल्य विकासावर भर देत असल्याचे केंद्रीय कौशल्य विकास मंत्री श्री. जयंतजी चौधरी यांनी यावेळी सांगितले.
चीन मधील शांघाय इथल्या जागतिक कौशल्य स्पर्धेत यांत्रिकी (Mechatronics), वीज संच मांडणी (Electrical Installations) इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, औद्योगिक तंत्रज्ञान, सायबर सेक्युरिटी आणि सामाजिक सुरक्षा तंत्रज्ञान या सहा कौशल्य क्षेत्रांशी संबंधित विद्यार्थी आपले प्रकल्प सादर करणार आहेत. भारतीय विद्यार्थी यात कुठेही कमी पडणार नाहीत. महाराष्ट्रातील दोन स्पर्धकांनी गेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय यश मिळवले असून या स्पर्धेतही नेत्रदीपक यश विद्यार्थी मिळवतील असा विश्वास व्यक्त करत मंत्री लोढाजी यांनी पुढील स्पर्धेसाठी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे…; ‘सक्षम २०२५-२६’ अभियानात काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?






