बांगलादेश क्रिकेट असोसिएशनचा BCCI कडे स्पेशल संदेश (फोटो सौजन्य - X.com)
यातून बांगलादेशातील नवीन प्रशासनाने भारतासोबत संबंध प्रस्थापित करण्याचा आणि क्रिकेट संबंधांमधील अलीकडील तणावपूर्ण काळातून पुढे जाण्याचा केलेला प्रयत्न दिसून येतो. तमीम इक्बाल यांची देशाचे सर्वात तरुण क्रिकेट प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर बांगलादेशने हा अलीकडील पुढाकार घेतला आहे. क्रिकेटसाठी हे चांगले पाऊल समजण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून बांगलादेश आणि भारताचे संबंध बिघडले असून IPL मधून मुस्तफिजूरला काढल्यानंतर वर्ल्ड कपमधूनही बांगलादेशने माघार घेतली होती.
IPL 2026 दरम्यान BCCI ने लागू केले कडक नियम, आता मैदानावर खेळाडूंचा प्रवेश होणार मर्यादित
नक्की काय घडले होते?
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, कोलकाता नाईट रायडर्सने बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानचा आयपीएल करार रद्द केला होता, त्यानंतर बीसीबीने त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतात येण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर आयसीसीने बांगलादेशला टी-२० विश्वचषकातून वगळून, त्याच्या जागी स्कॉटलंडचा समावेश केला.
वृत्तानुसार, ICC आणि BCCI ला सामोरे गेल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आता आपल्या क्रिकेटला होणाऱ्या संभाव्य नुकसानीची जाणीव झाली आहे. त्यामुळे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला पत्र लिहून क्रिकेट संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
घोटाळा उघडकीस आल्यानंतर, बांगलादेश सरकारने बीसीबी बोर्ड बरखास्त केले
दुसरीकडे, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रमुख अमीनुल इस्लाम बुलबुल यांनी, सरकारने पदावरून हटवल्यानंतर, आयसीसीकडे धाव घेतली आहे. अमीनुल इस्लाम बुलबुल हे त्यांच्या खेळाच्या दिवसांतील लढवय्या वृत्तीसाठी ओळखले जात होते.
कसोटी शतक झळकावणारे ते पहिले बांग्लादेशी फलंदाज होते. मंगळवारी, बांगलादेशच्या नवनिर्वाचित सरकारने स्थापन केलेल्या राष्ट्रीय क्रीडा परिषदेने, बुलबुल यांच्या नेतृत्वाखालील बोर्ड बरखास्त करून त्या जागी ११ सदस्यीय अंतरिम समितीची स्थापना केली. नवीन निवडणुका होईपर्यंत ही समिती बोर्डाच्या कामकाजावर देखरेख ठेवेल. या तदर्थ समितीच्या प्रमुखपदी बांगलादेशचे माजी कर्णधार तमीम इक्बाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
BCCI चा ऐतिहासिक निर्णय, Vaibhav Sooryavanshi साठी बदलले नियम? लवकरच दिसणार Team India च्या जर्सीत






