संजू सॅमसन (फोटो- ians)
संजू सॅमसनला संघाबहेर ठेवून 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले गेले आहे. त्यावरून एकच वाद निर्माण झाला आहे. या वादात आता पार्थिव पटेलने उडी मारली आहे. भावनिकदृष्ट्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले जाणे योग्य निर्णय आहे. मात्र वरिष्ठ खेळाडूला बाहेर बसवणे हे चुकीचे असल्याचे पार्थिव पटेल म्हटले आहे.
काय म्हणाला पार्थिव पटेल?
संजू सॅमसनच्या कामगिरीत सातत्य नसल्याचे पटेलने म्हटले आहे. त्यामुळे त्याला संघाबाहेर ठेवले जाते. मात्र इंग्लंडविरुद्धच्या सिरिजमधून त्याला बाहेर ठेवणे हे योग्य वाटत नाही. प्रत्येकवेळेस संजू सॅमसनच बाहेर का? त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला तर एक गोष्ट त्याच्यामागे लागलेली आहे, ते म्हणजे त्याच्या खेळीत सातत्य नसणे. जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या खेळीत सातत्य नसते अशा खेळाडूला बाहेर ठेवले जाते. भावनिकदृष्ट्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले जाणे योग्य निर्णय आहे. मात्र वरिष्ठ खेळाडूला बाहेर बसवणे हे चुकीचे असल्याचे पार्थिव पटेल म्हटले आहे.
‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान
यावर्षी झालेल्या ती 20 वर्ल्डकपमध्ये संजू सॅमसनने शानदार कामगिरी केली होती. मात्र आयर्लंड दौरा आणि इंग्लंड दौरा संजू सॅमसनसाठी अपयशी ठरला आहे. तो केवळ 6 रन्स करू शकला नाही. आयर्लंडने प्रथमच भारताला टी 20 सिरिजमध्ये पराभूत केले आहे. तर इंग्लंडने देखील भारताचा 3-0 ने पराभव केला आहे. तसेच मालिका आपल्या खिशात घातली आहे.
अभिषेक नायरचे मोठे विधान
‘संजू सॅमसनला खेळवेचे असेल तर सलामीवीर म्हणूनच खेळवा. अन्य जागेवर त्याला खेळवू नये. त्याला अशा जगी खेळवले पाहिजे जिथे तो यशस्वी होईल. त्याला तुम्ही 4,5,6 नंबरवर फलंदाजीसाठी पाठवू शकत नाही. या ठिकाणी त्याने फलंदाजी केली आहे, मात्र तो यशस्वी ठरला नाही.’ पुढे बोलताना अभिषेक नायर म्हणाले, ‘संजू सॅमसनला सलामीवीर किंवा टॉप 3 मध्ये खेळवल्यास तो चांगली फलंदाजी करू शकतो. तुम्ही त्याला त्या ठिकाणी तुम्ही खेळण्याची संधी देऊ शकत नसाल तर त्याला खेळवू नका असे मला वाटते.’ संजू सॅमसनने सलामीवीर आणि टॉप 3 मध्येच कायम फलंदाजी केली आहे.






