
बिहार क्रिकेटमधून वैभव सूर्यवंशीनंतर एक नवे वादळ समोर आले आहे. 15 वर्षीय अक्षरा गुप्ताने वन डे क्रिकेटमध्ये नाबाद तिहेरी शतक ठोकले आहे. यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्व थक्क झाले आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात. बिहार क्रिकेट असोसिएशनतर्फे अंडर 19 वनडे ट्रॉफीचे आयोजन करण्यात आले आहे. भागलपुरमध्ये अक्षरा गुप्ताने मैदानात येताच विरोधी संघाकह्या गोलंदाजांची धुलाई केली आहे.
अक्षरा गुप्ताने आपल्या खेळीत तिहेरी शतक लगावले आहे. या खेळी तिने तब्बल 55 फोर आणि 8 सिक्स मारले आहेत. म्हणजे 244 रन्स तिने केवळ फोर आणि सिक्स मारून केल्या आहेत. या वादळी खेळीसह अक्षरा गुप्ता देशांतर्गत महिला क्रिकेटमध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारी दुसरी भारतीय क्रिकेटर ठरली आहे.
HISTORIC TRIPLE CENTURY! बिहार की बेटी का महा-रिकॉर्ड! 👑🏏🔥 BCA महिला U19 टूर्नामेंट में अक्षरा गुप्ता ने इतिहास रचते हुए नाबाद 306* रनों की अविश्वसनीय पारी खेली है! 🚀💥 📊 रिकॉर्ड्स की सुनामी:
⭐ 126 गेंद, 306* रन (स्ट्राइक रेट: 242.86)
⭐ 55 चौके और 8 गगनचुंबी छक्के! pic.twitter.com/qw2QwgEoRM — Bihar Cricket Association (@BiharCricAssoc) June 18, 2026
अक्षरा गुप्ताने केलेल्या तिहेरी शतकी खेळीवर बिहार क्रिकेट असोसिएशनचे प्रेसिडेंट हर्षवर्धन यांनी तिचे अभिनंदन केले आहे. बिहारच्या महिला क्रिकेटर राज्याचे नाव उंचावत आहेत. बिहार क्रिकेट असोसिएशन युवा क्रिकेटर घडवण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
वैभव सूर्यवंशी अन् श्रीलंकन खेळाडूचा ‘तो’ राडा
भारत ‘अ’ आणि श्रीलंका ‘अ’ यांच्यातील नुकत्याच झालेल्या सामन्यादरम्यान युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि एका श्रीलंकन खेळाडूमध्ये मैदानावर झालेला वाद झाला. हा वाद सतत चर्चेचा विषय बनला आहेत्तानुसार, या घटनेनंतर सामनाधिकारी प्रदीप जयप्रकाश यांनी दोन्ही खेळाडूंना ५० टक्के दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे, जो त्यांच्या सामना शुल्कातून कापला जाईल. दरम्यान, भारत ‘अ’ संघाचा कर्णधार तिलक वर्मा याला एकूण ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयही वैभव सूर्यवशीवर कारवाई करेल अशीही चर्चा आहे. मात्र, आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव देवजित सैकिया यांनी परिस्थिती स्पष्ट केली आहे.