
नक्की काय आहे प्रकरण (फोटो सौजन्य - X.com)
आतापर्यंत हा नियम तुम्हाला माहीत होता का? हा नियम नक्की काय आहे आणि कशा पद्धीतने त्याचा वापर होतो हे आपण पहिल्यांदा या लेखाच्या मार्फत जाणून घेऊया. केवळ ४ धावा झालेल्या असताना स्कोअरबोर्डवर नक्की १४ धावा कशा झळकल्या याबाबत अनेकांना नियमच माहीत नाहीत. तेच आपण अधिक विस्तारपूर्वक समजून घेऊया.
Deepti Sharma: 5 विकेट्स घेत दीप्ती शर्माचा रेकॉर्ड्सचा पाऊस, T20 सर्वाधिक बळी घेणारी महिला खेळाडू
हा १० धावांचा दंड कोणत्या नियमांतर्गत आकारण्यात आला?
🚨 Crazy scenes in India A vs Sri Lanka A! Sri Lanka started their chase at 10/0 without facing a ball 😳 Reason: Vipraj Nigam was penalized twice for running on the pitch’s danger area, gifting 10 runs. India also got 5 penalty runs earlier after the ball hit Sri Lanka’s… pic.twitter.com/TGE4qTwVz0 — Kunal Bhanwala (@bhanwala_k38130) June 15, 2026
वास्तविक पाहता, क्षेत्ररक्षक पंच प्रगीथ रामबुकवेल्ला आणि शांता फोन्सेका यांनी ३४ व्या ते ३७व्या षटकांदरम्यान भारत ‘अ’ संघावर दोनदा प्रत्येकी पाच धावांचा दंड लावला होता. दुसरी चूक तेव्हा घडली, जेव्हा विप्राज निगमने चेंडू शॉर्ट थर्डच्या दिशेने खेळला आणि धाव घेण्यासाठी धावला, पण नॉन-स्ट्रायकर सूर्यांश शेडगेने त्याला परत पाठवले. आपल्या क्रीजवर परतण्याच्या प्रयत्नात, विप्राज निगम खेळपट्टीच्या मधोमध धावला, ज्याला ‘संरक्षित क्षेत्र’ (protected area) म्हणून ओळखले जाते. यामुळेच केवळ ४ धावा असूनही १० धावा अधिक मिळाल्या आणि संघाला याचा अधिक फायदा झाला.
वैभव सूर्यवंशी पुन्हा अपयशी
आयपीएल २०२६ मध्ये ७०० हून अधिक धावा करून आपली पहिली मालिका खेळणारा वैभव सूर्यवंशी सलग तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरला. तो १४ चेंडूंमध्ये २१ धावा करून बाद झाला. प्रभसिमरन सिंग, ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार तिलक वर्मा हे देखील स्वस्तात बाद झाले. संघाची धावसंख्या ७ गडी बाद १४३ असताना, विप्राज निगमने (४९ चेंडूंमध्ये ५१ धावा) सूर्यांश शेडगेसोबत (६६ चेंडूंमध्ये ७२ धावा) इंडिया ‘अ’ संघाचा डाव सावरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी आठव्या विकेटसाठी १०४ धावा जोडून इंडिया ‘अ’ संघाची धावसंख्या २६५ पर्यंत पोहोचवली.
IND vs AFG ODI: आईचा फोन आला अन् पत्रकार परिषद थांबली; नीतीश रेड्डीचा भावनिक क्षण, Video व्हायरल