भारतीय संघ(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरवात झाली आहे. ही मालिका येथून पुढे अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ओळखली जाणार आहे. लीड्स येथील हेडिंग्ले मैदनावर हा सामना खेळवण्यात येत आहे. सामान्यपूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यातील दोन्ही खेळाडूंनी आपल्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काळ्या पट्ट्या बांधून गुजरातच्या अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सामाना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी दोन मिनिटं मौन पाळले होते. याबाबत बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म एक्सवर ट्विट देखील केले आहे.
हेही वाचा : IND vs ENG : ब्रिटिशांनी जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; भारतीय फलंदाजांची लागणार कसोटी…
१२ जून हा दिवस भारतासाठी खूप वेदनादायी ठरला आहे. या दिवशी दुर्दैवी घटना घडली होती. गुजरातच्या अहमदाबादमध्ये विमान अपघात घडून विमानातील २४१ जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने देशासह जगाला धक्का बसला होता. या अपघातात या भीषण दुर्घटनेवर जगातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. या पूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप्सछाया अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघाच्या खेळाडूंनी देखील काळ्या पट्ट्या बांधून अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली होती.
The Indian Cricket Team and the England Cricket Team observed a moment of silence in memory of the victims of the Ahmedabad plane crash ahead of the start of play on Day 1 of the first Test at Headingley, Leeds.
The teams are wearing the black armbands to express solidarity with… pic.twitter.com/Guxf1aO8iJ
— BCCI (@BCCI) June 20, 2025
गुरुवार, १२ जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे विमान अचानक आणि त्याचा भला मोठा स्फोट झाला. हे विमान बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर (फ्लाइट एआय१७१) होते, जे अहमदाबादहून लंडनसाठी निघाले होते. परंतु, उड्डाणानंतर काही मिनिटांमध्ये मेघनीनगर परिसरात दुर्घटना घडली. या विमानात २४२ लोक होते, ज्यामध्ये १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, एक कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिकांचा समावेश होता. या घटनेनमध्ये २४१ लोकांचा मृत्यू झाला होता.
सामन्याची स्थिती
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिका आजपासून सुरू झाली आहे. या मालिकेला अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी या नावाने ओळखले जाणार आहे. लीड्स येथील हेडिंग्ले मैदनावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना खेळवण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेकिचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहेत. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल फलंदाजी करत आहेत. आतापर्यंत १४ षटकांचा खेळ झाला असून यशस्वी जैस्वाल २७ तर केएल राहुल १६ धावांवर खेळत आहेत.