
PCB's advertisement backfired! The attempt to mock Indian cricketers went wrong; fans trolled them; watch the VIDEO.
India-Pakistan handshake controversy : ऑस्ट्रेलियन संघ टी-२० मालिकेसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार आहे. टी-२० मालिकेपूर्वी पाकिस्तानकडून या मालिकेसाठी एक जाहिरात तयार करण्यात आली आहे. ज्यामध्ये सर्वात जास्त भर हा हस्तांदोलनांवर देण्यात आलेला आहे. पीसीबीने प्रसिद्ध केलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये पाकिस्तानची आदरातिथ्य आणि क्रिकेट संस्कृती दाखवली गेली आहे. तर हस्तांदोलनाचा मुद्दा उपस्थित करण्याचाही तो प्रयत्न केलेला दिसत आहे. नेमकी जाहिरात काही आहे, जाणून घेऊया.
प्रोमोमध्ये एक ऑस्ट्रेलियन चाहता टॅक्सी ड्रायव्हरशी बोलताना दिसत आहे. तो टॅक्सीतून उतरून निघून जाताना, पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर त्याला थांबवून उर्दूमध्ये म्हणतो, “तू हस्तांदोलन करायला विसरलास. असे दिसते की तुला तुझ्या शेजाऱ्यांनीही थांबवले होते.” आशिया कप दरम्यान भारताकडून पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास टाळले होते. त्यामुळे ही जाहिरात बनवली गेल्याचे दिसते. पाकिस्तान धक्का बसला होता आणि असे दिसत आहे की, ते अजून देखील या धक्क्यातून सावरलेले दिसत नाही.
अशी वादग्रस्त जाहिरात प्रसिद्ध करून पाकिस्तानने वाद ओढवून घेतला आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की पीसीबीने अशी जाहिरात तयार करून एक संवेदनशील मुद्दा पुन्हा एकदा पेटवला आहे. या जाहिरातीत टी-२० कर्णधार सलमान अली आगा देखील दिसून येत आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहते अधिकच संतप्त झाले आहे.
अलिकडच्या काही महिन्यांमध्ये पाकिस्तान क्रिकेटकडून त्यांच्या संदेशाद्वारे किंवा मैदानावरील हावभावांद्वारे ऑनलाइन गप्पांमध्ये राष्ट्रीय भावना मिसळण्याची ही पहिलीच वेळ नसून या आधी देखील पाकिस्तानकडून असे उद्योग करण्यात आलेले आहेत. पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया मालिका जवळ येत असताना, लक्ष पुन्हा क्रिकेटच्या मैदनाकडे वळेल अशी अपेक्षा असताना, वादग्रस्त प्रोमोने पुन्हा एकदा हे दाखवून दिले आहे की उपखंडात राजकारण आणि खेळ किती मिसळलेले आहे.
“Handshake bhool gaye aap lagta hai ,padosiyon ke paas bhi rukay thay aap” PCB ABSOLUTELY COOKED INDIA IN THE PROMO FOR AUSTRALIA’S TOUR OF PAKISTAN 😂🔥 That’s some content 👌pic.twitter.com/SaQWmCHVkG — junaiz (@dhillow_) January 21, 2026
हेही वाचा : IND vs NZ 1st T20I : अभिषेक शर्माचा आणखी एक पराक्रम! आंद्रे रसेलला धोबी पछाड देत नोंदवला ‘हा’ विक्रम
दोन्ही देशांमधील संबंध दशकांपासून खूप वेळा ताणले गेले आहे. परंतु एप्रिल २०२५ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून केलेल्या पहलगाम हल्ल्यामुळे आणि त्यानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे त्यांचे संबंध आणखीच बिडघल्याचे चित्र आहे.