टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी रोहित शर्मा राजदूत म्हणून नियुक्त(फोटो-सोशल मीडिया)
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेसाठी राजदूत म्हणून रोहित शर्माच्या नावाची घोषणा करताना आयसीसी चेअरमन जय शहा यांनी म्हटले की, ” भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या आगामी टी२० विश्वचषका २०२६ या स्पर्धासाठी रोहित शर्मा हा स्पर्धेचा राजदूत आहे हे जाहीर करताना मला अभिमान वाटत आहे. २०२४ च्या टी२० विश्वचषकाचा विजेता कर्णधार आणि आतापर्यंतच्या सर्व नऊ आवृत्त्यांमध्ये खेळलेला खेळाडू या स्पर्धेसाठी यापेक्षा चांगला प्रतिनिधी असू शकत नाही.”
It’s my honour to announce that @ImRo45 is the tournament ambassador for the upcoming @T20WorldCup in India & Sri Lanka.
There can be no better representative for the event than the winning captain of the 2024 T20 World Cup, and a player who has been in all nine editions so far. pic.twitter.com/muWh3mUflj — Jay Shah (@JayShah) November 25, 2025
२०२६ चा टी२० विश्वचषक स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासुन सुरू होणार आहे. ८ मार्च रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल. भारत आणि श्रीलंका हे दोघेही विश्वचषक आयोजन करणार आहेत. पाकिस्तान त्यांचे सर्व सामने कोलंबो किंवा कॅंडी येथे खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धेचे स्वरूप २०२४ च्या विश्वचषकासारखेच असणार आहे. ज्यामध्ये २० संघ चार गटांमध्ये विभागले जातील. विश्वचषकामध्ये प्रत्येक गटामधील पहिले दोन संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करणार. त्यानंतर या संघांना दोन सुपर ८ गटांमध्ये विभागले जाऊन प्रत्येक गटात चार संघ असतील. या सुपर ८ गटांमधील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्य फेरीत आणि नंतर अंतिम फेरीत प्रवेश करतील.






