फोटो सौजन्य - X
राजस्थान रॉयल्सच्या संघात बदल : राजस्थान रॉयल्सच्या संघाने या सिझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. संघाने आतापर्यत 12 सामने खेळले आहेत यामध्ये त्यांना फक्त 3 सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर या स्पर्धेमध्ये त्यांना 9 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या गुणतालिकेत राजस्थान रॅायल्सचा संघ नवव्या स्थानावर आहे. आता राजस्थान रॉयल्सच्या संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज संदीप शर्मा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. आता संघाने संदीप शर्माच्या जागी खेळाडूची घोषणा केली आहे. राजस्थान रॉयल्सने संदीप शर्माच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या नांद्रे बर्गरचा समावेश केला आहे. गुरुवारी नांद्रे बर्जर राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला. याशिवाय, नितीश राणाच्या जागी दक्षिण आफ्रिकेच्या प्रिटोरियसला घेण्यात आले आहे. बोटाच्या फ्रॅक्चरमुळे संदीप शर्मा आयपीएलमधून बाहेर पडला होता हे लक्षात घेण्यासारखे आहे. या वेगवान गोलंदाजाने संघाबाहेर जाण्यापूर्वी १० सामने खेळले होते ज्यात त्याने नऊ विकेट्स घेतल्या होत्या. राजस्थान रॉयल्स संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
IPL 2024. Powerplay. 153 kmph. Kuch yaad aaya? 👀 Nandre Burger will replace an injured Sandeep Sharma for the remainder of our IPL 2025 season. We wish Sandy a speedy recovery! 💗 pic.twitter.com/Q3cqD3dfkK — Rajasthan Royals (@rajasthanroyals) May 8, 2025
डावखुरा वेगवान गोलंदाज बर्गरने गेल्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून सहा सामने खेळले होते आणि सात विकेट्स घेतल्या होत्या. राजस्थान रॉयल्सने त्याला ३.५ कोटी रुपयांना त्यांच्या संघात घेतले आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की राजस्थान संघाला या हंगामात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पहिले म्हणजे, कर्णधार संजू सॅमसन फिट नसल्याने अनेक सामन्यांमध्ये उपलब्ध नव्हता. याशिवाय, अनेक प्रमुख खेळाडूंना या सिझनमध्ये ऑक्शनमध्ये पुन्हा घेतले नाही त्यामुळे संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे.
PBKS vs DC : पंजाब किंग्स फक्त 1 विजय दूर, श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय
या सिझनमध्ये राजस्थान रॉयल्स संघाच्या कामगिरीत सातत्य नव्हते त्याचबरोबर संघाची गोलंदाजी देखील निराशाजनक राहिली आहे. यावर्षी संघात काही नवीन चेहरेही समाविष्ट करण्यात आले. वैभव सूर्यवंशी हे त्यापैकीच एक होते. पण इतर खेळाडूंची कामगिरी फक्त तुकड्यांमध्ये चांगली राहिली आहे. परिणामी संघ प्लेऑफच्या शर्यतीतूनही बाहेर पडला. या वर्षी राहुल द्रविड संघाचा प्रशिक्षक म्हणून संघाशी जोडला गेला. असे असूनही, संघ कामगिरीच्या पातळीवर स्वतःला प्रेरित करू शकला नाही.






