भारत विरुद्ध आयर्लंड सामना (फोटो- सोशल मीडिया)
भारतीय संघ आज टी 20 चा नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात आयर्लंडविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे. आजच्या संघात अनेक नवीन खेळाडू दिसण्याची शक्यता आहे. आजच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आज इंटरनॅशनल डेब्यू करण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध दोन टी 20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर सर्वांचे लक्ष १५ वर्षीय भारतीय खेळाडू वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. त्याला आज भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. जर वैभव आज मैदानात उतरला, तर तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण खेळाडू ठरेल. पदार्पण करताच तो महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रमही मोडू शकतो.
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग ११
भारत: वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, श्रेयस अय्यर (कर्णधार), टिळक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा
आयर्लंड: टिम टेक्टर, रॉस अडायर, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर (विकेटकीपर/कर्णधार), गॅरेथ डेलानी, स्टीफन डोहेनी, जॉर्ज डॉकरेल, बेंजामिन कॅलिट्झ, मॅथ्यू हम्फ्रीज, रुबेन विल्सन आणि गॅविन होए.
India Vs Ireland मध्ये कधी खेळवला गेला शेवटचा सामना? रोहित शर्माने केल्या होत्या ‘इतक्या’ रन्स
India Vs Ireland मध्ये कधी खेळवला गेला शेवटचा सामना?
भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात शेवटचा सामना टी 20 सामना 5 जून टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान खेळला होता. हा सामना भारताने 8 विकेट्सने जिंकला होता. तेव्हा रोहित शर्मा अन् विराट कोहली देखील संघाचा समावेश होता. तया सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत आयर्लंडला 100 रन्सच्या आत रोखले होते.
आयर्लंडचा संघ 16 ओव्हरमध्ये 96 रन्सकरून ऑल आउट झाला होता. यावेळेस हार्दिक पंड्याने 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. तर जसप्रीत बूमराहला 2 विकेट्स मिळाल्या. तर भारतीय संघाने हे आव्हान 12 ओव्हर्समध्ये हे लक्ष्य पूर्ण केले होते. या सामन्यात विराट कोहली केवळ 5 रन्स करून आउट झाला होता. तर रोहित शर्माने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. भारतीय संघांने शानदार विजय मिळवला होता.






