शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग वाढली! कृषी विभागाकडून सतर्कतेचा इशारा, पेरणीची घाई करू नये
मृगनक्षत्र लागताच महागाव तालुक्यासह शेंबाळपिंपरी परिसरात शेतकऱ्यांमध्ये खरीप पेरणीची लगबग दिसून येत आहे पाऊस येण्याचे चिन्हे दिसताच आणि आकाशात आभाळ पाहून शेतकरीराजा सुखावल्याचे पाहावयास मिळत आहे. यापूर्वीच परिसरात शेतीतील नांगरणी वखरणी झाली आहे. जमीन प्रखर उन्हात तापून गर्भातील नांगरणीमुळे ढेकळ मुरून सुपीक मातीत रूपांतर झाले आहे. निसर्गाचे आणि मृग नक्षत्राचे पाणी जोपर्यंत पेरणीसाठी पडत नाही, तोपर्यंत शेतकरी पेरणी करणार नाही, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)
रखरखत्या उन्हातही शेती मशागतीची कामे! मान्सूनची चाहूल; संकटांचा सामना करत बळीराजाने कंबर कसली
खरे तर जमिनीतील माती परीक्षण, मातीचे गुणधर्म, जलसंधारण क्षमता, घनता, आकार, ओलाव्याचे प्रमाण, रासायनिक गुणधर्मात क्षारता, स्फुरद आणी कॅल्शियम मॅग्नेशियम व लोह यांचे प्रमाण तपासून बियाणे व खते वापराबाबत कृषी विभागाकडून एक महिन्यापूर्वीच सल्ला मिळायला पाहिजे होते. परंतु कृषी विभागाला उशिरा शहाणपणा सुचले. सध्या कृषी विभागाकडून अशा शिबिरांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे.
विशेष म्हणजे, तालुका कृषी विभागाचे शेंबाळपिंपरी कृषी मंडळाकडे कायमच दुर्लक्ष राहिलेले आहे. शेंबाळपिंपरी कृषी मंडळाकडे शेंबाळपिंपरी कृषी मंडळाधिकारी फिरकत नाही. ठवड्यातून काही दिवस कृषी सहाय्यक आपली हजेरी ग्रामपंचायतमध्ये लावतात. काही शेतकऱ्यांना भेटतात आणि जातात. तालुका कृषी अधिकारी मुकाडे यांनी शेंबाळपिंपरी कृषी मंडळाकडे लक्ष देऊन कृषी मंडळ अधिकारी यांना शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी समज द्यावी, अशी शेंबाळपिंपरी कृषी मंडळातील शेतकऱ्यांची मागणी आहे.
कृषी विभागाकडून प्रत्येक मंडळात कृषी सहाय्यक यांच्याकडून पेरणी आणि मशागतीसाठी मार्गदर्शन होत आहेत. शुक्रवारी बाळपिंपरी कृषी मंडळाचे कृषी सहाय्यक मनोज कांबळे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन केले. यावेळी कांबळे म्हणाले की, पुरेशा पावसाअभावी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. सरी वरंबा पद्धतीनेच पेरणी करावी. बी-बियाण्याबाबतसुद्धा मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, सोयाबीन बियाणे नाजूक असल्यामुळे त्याची काळजी घेतली पाहिजे.






