पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे ज्वारीच्या मळणी यंत्रात अडकून महिला शेतकरी मंगल कुंभारकर यांचा जागीच मृत्यू झाला. या थरकाप उडवणाऱ्या घटनेने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरु आहे. शिवतारे यांनी प्रस्तावित केलेल्या पुरंदर आयटी पार्कबाबत २४ जुलै २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली होती.
पुरंदरच्या मांढर टोणपेवाडी व शिंदेवाडी वन विभागाच्या हद्दीत वनांना आग लावून शिकारीच्या प्रयत्नात असलेल्या दोघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले असून दोघानाही अटक केली आहे.
प्रशासनाकडून ९६ टक्के शेतकऱ्यांनी विमानतळासाठी जमीन देण्यास संमती दर्शविल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी ती संमती माघारी घेतल्याचा दावा बैठकीत केला.
पुरंदर तालुक्यातील उदाचीवाडी येथे केवळ एक गुंठा जमीन नावावर करून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
वाड्या वस्त्यांवर गाडी सुद्धा जाऊ शकत नाहीत, कचऱ्याची मोठी समस्या आहे, विद्युत व्यवस्था अद्यापही अनेक ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास यापूर्वीच्या लोकांना अपयश आले आहे.
गावागावात मंदिरांचे कळस उभे राहिले पाहिजेत. त्याचबरोबर ज्ञानमंदिरेही उभी राहिले पाहिजे. प्राथमिक शिक्षणासोबतच व्यावसायिक, तांत्रिक शिक्षण येथे मिळाल्यास रोजगार निर्मितीसाठी त्याचा उपयोग होईल.