Travel: जगाच्या कोपऱ्यात वसलंय एक रहस्यमयी गाव, इथे जाताच गायब होतात लोक; सरकारनेही केलेत हात वर
जगात अनेक सुंदर ठिकाणे आहेत जिथे एकदा तरी भेट द्यावी अशी आपली इच्छा असते. मात्र आम्ही तुम्हाला सांगतो, जगात अशीही काही ठिकाणे आहेत जिथे जाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. हे जग नैसर्गिक सौंदर्याने व्यापलेले आहे. जगात अनेक अशा रहस्यमयी गोष्टी आहेत ज्यांचं कोड आजवर मानव सोडवू शकता नाही. आज आम्ही तुम्हाला या लेखात जगाच्या कोपऱ्यात दडलेल्या अशाच एका गावाविषयी माहिती सांगत आहोत, इथे एकदा का कोणी व्यक्ती गेली मग ती व्यक्ती पुन्हा परत येत नाही. हे एक असे ठिकाण आहे जिथे जाण्यास खुद्द सरकार नागरिकांना रोखतं. हे ठिकाण नक्की कुठे आहे ते जाणून घेऊया.
हे गाव जपानमध्ये आहे. या गावच्या बाहेरचं ‘जपानची प्रशासकीय हद्द समाप्त, तुमचं एक पुढचं पाऊल अन् तुम्ही जपानबाहेर’ असे फलक लावण्यात आले आहे. या गावाचे नाव आहे ‘इनुआकी’, मागील काही काळापासून या गावाबद्दल अनेक धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. इंस्टाग्रामवरील @muskanarrates नावाच्या अकाऊंटवर या गावाविषयीची माहिती देण्यात आली आहे. या गावाबाबत नागरिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये इतकी दहशत आहे की लोक इथे जाण्याचे धाडसही करत नाहीत.
महाराष्ट्रातील ‘मिनी काश्मीर’ माहिती आहे का? निसर्गाच्या कुशीत ‘या’ ठिकाणी लपलंय…
व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे, काही धाडसी लोकांनी या गावात जाण्याचा प्रयत्न केला खरा मात्र ते इथून पुन्हा परतू शकले नाही. इथे नक्की असं काय घडत? असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल तर याचे उत्तरही व्हिडिओत सांगण्यात आले आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण या गावात चक्क माणसांना खाल्लं जात, इथे मंत्र तंत्रही केले जातात, फक्त करमणुकीसाठी इथे व्हिडिओमध्ये नरबळी दिला जातो. व्हिडिओमध्ये केलेल्या दाव्यानुसार, इथे किंकाळ्या आणि चित्रविचित्र आवाज ऐकू येतात.
भारतातील ‘या’ ठिकाणी पाहायला मिळेल इंग्लंड-स्वित्झर्लंडसारखे दृश्य, सहल बनेल संस्मरणीय
नेमकं खरं काय?
आता आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तिवक, जपानमधील इनुआकी हे गाव प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही. 1986 मध्ये जपानमधील इनुआकी धरण बांधण्यात आले होते त्याचवेळी हे गाव पाण्याखाली गेलं. या गावाचं मुळातच अस्तित्व नाही मात्र याच्या कथाही आजही फार प्रचलित आहेत. या गावाच्या केंद्रस्थानी असणारा बोगदा 1954 मध्ये इथं येणाऱ्या पर्यटकांना डोंगररांगांपर्यंत जाण्यासाठी बांधला जात होता. जो आता मात्र निर्मनुष्यच पाहाला मिळतो. 1988 मध्ये इथे एक भयंकर घटना घडली, जिथं पाचजणांनी एका इसमाचा छळ करून त्याला मारून टाकलं. आजच्या क्षणाला इथं असणारा हा बोगदा सध्या अशा अवस्थेत आहे जिथं कोणालाही जाण्यास मनाई असून एका क्रूर घटनेचा साक्षीदार म्हणूनच तो जगप्रसिद्ध आहे.