(फोटो सौजन्य: X)
सहसा, सदर तहसीलमध्ये आयोजित संपूर्ण समाधान दिनामध्ये ज्येष्ठ नागरिक त्यांच्या समस्या घेऊन येतात, पण यावेळी एका अल्पवयीन मुलाने इथे हजेरी लावली ज्यामुळे सर्वांचे लक्ष याकडे लागून राहिले. मुलगा ८वी इयत्तेत शिकत असून अमिताभ असे त्याचे नाव आहे. तहसील कार्यालयात पोहचताच तो थेट जिल्हाधिकारी अंजनी कुमार सिंह यांच्या समोर जाऊन उभा राहिला. आपली तक्रार व्यक्त करत त्याने सांगितले की, त्याच्या काकांनी घराला टाळा लावल्याने कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
आईला खोटं सांगून घराबाहेर पडला
मुलगा आपली तक्रार सांगताना अधिकाऱ्यांना फार लक्षपूर्वक त्याची समस्या ऐकूण घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी मुलाला आश्वासन दिले की, या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल आणि योग्य ती कारवाई केली जाईल. घटनेच्या काही वेळानंतर सूचना विभागाकडून एक प्रेस नोट देखील जारी करण्यात आले ज्यात घटनेशी जोडलेले तथ्य सादर करण्यात आले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरुन शहर पोलीस निरीक्षक राजेश कुमार सिंह घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी कुटुंबाशी संवाद साधला. चाैकशीदरम्यान मुलाच्या आईने सांगितले की, अमिताभला अभ्यासात रुचि आहे आणि तो नेहमीच इकडे तिकडे फिरत असतो. त्यांनी हे देखील सांगितले की, तो घरातून ट्रांसफर सर्टिफिकेट (टीसी) घेण्यासाठी शाळेत जात आहे असे कारण देऊन तो निघाला आणि तहसील कार्यालयात गेला.
तहसील दिवस में डीएम और बच्चे की बात सुने ।
ज़िला लखीमपुर खीरी । pic.twitter.com/aH80XvfqoI — Abhinav_bebaak (@abhinavBebaak) July 18, 2026
चाैकशीदरम्यान मुलाचे वडिल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे समोर आले आहे. काैंटुबिक वाद किंवा मालमत्तेच्या वादांमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. अधिकाऱ्यांच्या मते, केवळ कुलुपाचा मुद्दाच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची परिस्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. प्रशासनाने हे प्रकरण फक्त चाैकशीपर्यंत मर्यादिस ठेवेल नसून मुलाचे शिक्षण आणि भविष्याचाही विचार केला जाणार आहे. मुलाच्या शिक्षणावर परिणाम न होता कुटुंबाला आवश्यक ती मदत करावी असे निर्देश जिल्हाधिकांऱ्यांनी दिले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






