आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच आपली कंबर कसली असून अहिल्यानगरमध्ये पक्षाची महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा किंवा भाजप सोडून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पक्षाला नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे वळवला असून त्या दृष्टीने निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बैठकीस राज्य महासचिव किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते प्रा. अरुण जाधव, उत्कर्ष रूपवते, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांच्यासह जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा महासचिव उत्तर मधुकर साळवे, योगेश क्षीरसागर, अजित कुऱ्हाडे, सोमनाथ भैलुमे, फैरोज पठाण आदींसह सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मंदाताई अडागळे, आस्मा शेख यांनी पक्षाच्या विचारधारा स्वीकारत वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आतापासूनच आपली कंबर कसली असून अहिल्यानगरमध्ये पक्षाची महत्त्वपूर्ण पूर्वतयारी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा किंवा भाजप सोडून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात पक्षाला नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आता वंचित बहुजन आघाडीने आपला मोर्चा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीकडे वळवला असून त्या दृष्टीने निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यावेळी बैठकीस राज्य महासचिव किसन चव्हाण, राज्य प्रवक्ते प्रा. अरुण जाधव, उत्कर्ष रूपवते, राज्य उपाध्यक्ष दिशा शेख, दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे आणि उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांच्यासह जिल्हा महासचिव प्रसाद भिवसने, जिल्हा महासचिव उत्तर मधुकर साळवे, योगेश क्षीरसागर, अजित कुऱ्हाडे, सोमनाथ भैलुमे, फैरोज पठाण आदींसह सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी मंदाताई अडागळे, आस्मा शेख यांनी पक्षाच्या विचारधारा स्वीकारत वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला.






