सीमेवर चकमक! तालिबानशी झालेल्या लढाईत १९ पाकिस्तानी सैनिक मारले गेले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan-Afghanistan Relations: अफगाणिस्तानवरील हवाई हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागत आहे. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तालिबानने कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर पाकतिया आणि खोस्त प्रांतात पाकिस्तान आणि तालिबानमध्ये चकमक झाली. या चकमकीत 19 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत.
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि तालिबानमधील संबंध बिघडले आहेत. काल तालिबानी सैनिक पाकिस्तानच्या सीमेकडे सरकत होते. खोस्त आणि पक्तिया प्रांतांच्या सीमेवर आज सकाळपासून दोघांमध्ये चकमक सुरू आहे. जसजसे तालिबानी लढवय्ये पुढे जात आहेत तसतसे तालिबानने युद्ध करणे टाळावे अन्यथा ते हल्ले सुरूच ठेवतील, अशी धमकी पाकिस्तानी पंतप्रधानांनी दिली होती. मात्र या धमकीचा तालिबानवर काहीही परिणाम झालेला नाही.
ख्रिसमसच्या एक दिवस आधी, पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील अनेक लक्ष्यांवर हवाई हल्ले केले होते, ज्यात सुमारे 50 लोक मारले गेले होते. हवाई हल्ल्याचा बदला घेण्यासाठी तालिबानने कारवाई सुरू केली आहे. खुद्द तालिबानच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. तालिबानने दावा केला आहे की त्यांनी आतापर्यंत पाकिस्तानच्या दोन लष्करी चौक्यांवर कब्जा केला आहे. याशिवाय पाकिस्तानी लष्कराचे अनेक जवानही मारले गेले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीनने दाखवली ‘अदृश्य हत्यारा’ची झलक; अमेरिकेचीच नव्हे तर भारताचीही चिंता वाढली
या चकमकीत 19 पाकिस्तानी सैनिक मारले गेले
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, खोस्त आणि पक्तिया प्रांतात अफगाण आणि पाकिस्तानी सीमा सैन्यामध्ये झालेल्या चकमकीत 19 पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. पाकिस्तानने डागलेल्या मोर्टार शेल्समुळे पाकतियाच्या दांड-ए-पाटन जिल्ह्यात तीन नागरिकांचाही मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दोघांमध्ये हाणामारी सुरूच आहे.
तालिबान हवाई हल्ल्याचा बदला घेत आहेत
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अनेक लोक मारले गेले. ज्यानंतर तालिबान बदला घेण्याचा प्रयत्न करत आहे. तालिबानने आपले सैनिक मोठ्या प्रमाणात तैनात केले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकच्या दहशतवादी कारवायांमध्ये वाढ! PoKमध्ये 200 SPG कमांडो तैनात; जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा रचला जातोय कट
शाहबाज शरीफ यांची धमकी निष्फळ ठरली
हल्ल्यापूर्वी पाकिस्तानी लष्कर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तालिबानने युद्धापासून दूर राहावे, अन्यथा ते भविष्यातही अफगाणिस्तानात हल्ले सुरू ठेवतील, अशी धमकी दिली होती. अलीकडेच अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतात पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात 50 जण ठार झाले होते. त्यानंतर तालिबान सरकारने त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या धमकीनंतरही तालिबान पाकिस्तानवर सातत्याने हल्ले करत आहेत.