UNSC मध्ये भारताच्या दावेदारीवर चीनची भारताला साथ? पहिल्यांदाच स्पष्ट केली भूमिका (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
याच पार्श्वभूमीवर त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान जागतिक तज्ज्ञांसमोर भारताचा दृष्टीकोन स्पष्ट केला. जयशंकर यांनी भारताच्या दृष्टीकोन स्पष्ट करताना सांगितले की, शांतता, नियम, विश्वास आणि सचोटी ही भारताची मूल्य आहेत. ही मूल्ये जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी सर्वसमावेशक दृष्टिकोनासाठी गरजेची असल्याचे भारताने अधोरेखित केले. यावर संपूर्ण जगाचे लक्ष असून चीनने प्रथमच दखल घेतली आहे. चीन काय म्हणाला जाणून घेऊयात.
भारताच्या UNSC मध्ये सदस्यात्वावर चीनने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी परिषदेत भारताच्या २०२८-२९ च्या कालवधीसाठी स्थायी सदस्यत्वाच्या दावेदारीची दखल घेतल्याचे म्हटले. परंतु चीनने भारताच्या उमेदवारील पाठिंबा किंवा विरोध केला नाही.
काही तज्ज्ञांच्या मते, चीन सध्या भारताच्या परिषदेत सदस्यात्वार सावध भूमिका ठेवून आहे. चीन हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य असल्याने भारताचे देखील यावर बारकाईने लक्ष्य आहे. कारण चीनकडे परिषदेत भारताला स्थायी सदस्यात्वासाठी व्हेटो देण्याचा म्हणजे नकार देण्याचा स्पष्ट अधिकार आहे.
चीनने प्रतिक्षा करा आणि पहा अशा भूमिका घेतली आहे. परंतु याच वेळी सुरक्षा परिषदेतील अमेरिका, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्स या स्थायी सदस्यांनी भारताच्या परिषदेत स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे. यामुळे भारताची जागतिक पातळीवरील वाढती भूमिका आणि विश्वासार्हता पुन्हा एकदा स्पष्ट होते.
भारताने आतापर्यंत आठ वेळा सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून काम केले आहे. आतापर्यंत भारताने अनेक वेळा सुरक्षा परिषदेत व्यापक सुधारणेची मागणी केली आहे. सध्याची जागतिक परिस्थिती आणि बदलते भू-राजकीय समीकरण्याच्या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांना प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक असल्याचे भारताने म्हटले. यामूळे भारताची जागतिक महत्त्व अधिक मजबूत होईल. परंतु सध्या भारताला कोणत्या देशांचा पाठिंबा मिळतो आणि चीन यावर काय निर्णय घेईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.






