IND vs ENG: मैदानातील एक चूक अन् करियर धोक्यात? आयसीसीची Gurnoor Brar वर कारवाई
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यानंतर, जेव्हा फलंदाजी प्रशिक्षक कोटक यांना विचारण्यात आले की, भारतीय संघ सलामीवीर म्हणून रोहित शर्माऐवजी यशस्वी जैस्वाल किंवा ईशान किशन यांना संधी देण्याचा विचार करत आहे का, तेव्हा त्यांनी रोहितचा बचाव करत म्हटले, ‘मला नाही वाटत की रोहित शर्मासारखा मोठा खेळाडू कोणत्याही दबावाखाली येऊ शकतो. तो इतका महान खेळाडू आहे की या गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होत नाही. हो, त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये धावा केल्या नाहीत, पण त्याने काही फरक पडत नाही. दुसऱ्या सामन्यातही तो मोठी खेळी करेल असे वाटत होते, पण ठीक आहे.’
रोहितच्या संथ फलंदाजीचा बचाव करताना कोटक म्हणाले की, ‘मी खूप क्रिकेट खेळलो आहे आणि पाहिले आहे. कधीकधी फलंदाजांना हवा असलेला मोमेंटम मिळत नाही आणि हे सामान्य आहे. लॉर्ड्सवर तुम्हाला रोहित शर्माची एक पूर्णपणे वेगळी खेळी पाहायला मिळेल. त्यामुळे, तो संघर्ष करत होता असे मी म्हणणार नाही. कदाचित बाउन्यमुळे त्याला त्याचे नेहमीचे शॉट्स खेळता येत नव्हते. दुसरीकडे, शुभमन आणि विराटने वेगवान सुरुवात केली, पण रोहितला त्याच्या स्लॉटमध्ये चेंडू मिळत नव्हते. त्यामुळे, रोहितसारख्या खेळाडूसाठी ‘संघर्ष’ हा शब्द वापरणे योग्य ठरणार नाही.’
२०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाला डोळ्यासमोर ठेवून, भारतीय संघ आता प्रत्येक मालिकेची तयारी करत आहे. वृत्तानुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने रोहित शर्माला कळवले आहे की, तो २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या योजनांचा भाग असणार नाही. परिणामी, १९ जुलै रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध होणारा तिसरा एकदिवसीय सामना रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना ठरू शकतो.






