पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक मुली असुरक्षित; अपहरण, सक्तीचे विवाह आणि धर्मांतरात वाढ (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
२०२५ मध्ये, पाकिस्तानात अपहरण, सक्तीचे विवाह आगि धर्मांतराच्या बळी ठरलेल्या मुली आणि महिलांपैकी सुमारे ७५ टक्के हिंदू आणि २५ टक्के ख्रिश्चन होत्या. त्यांनी सांगितले की, अशा सुमारे ८० टक्के घटना सिंध प्रांतातून नोंदवल्या गेल्या. कारवाईचा अभाव या चालू असलेल्या प्रथेला खतपाणी घालत आहे. १४ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलींना विशेषतः लक्ष्य केले जात आहे. गरीब आणि वंचित कुटुंबांतील मुली आणि तरुण खिया अशा कृत्यांच्या बळी ठरण्याची शक्यता अधिक असते. पीडित मुली आणि स्त्रियांना केवळ शारीरिक आणि लैंगिक हिंसाचार, सामाजिक कलंक आणि तीव मानसिक आघाताचाच सामना करावा लागत नाही, तर त्यांना आपल्ला धर्म आणि श्रद्धा पाळण्याच्या स्वातंत्र्यापासूनही वाचत ठेवले जाते. या स्त्रिया आणि मुली दहशतीच्या छायेखाली जगत आहेत… हे थांबलेच पाहिजे.
एकीकडे पाकिस्तानमध्ये महिलांची आणि मुलींचा छळ होत असतानाच पाकिस्तान दुबईला टक्क देण्याचे स्वप्न पाहत आहे. यासाठी चीनच्या मदतीने विकसित होत असलेल्या बलूचिस्तानमधील ग्वादर बंदरगाहला दुसरे दुबई बनवण्यासाची पाकिस्तानची योजना आहे. यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत २५ अब्ज डॉलरची भर पडले असे पाकिस्तानला वाटते. यासाठी पाकिस्ताने दुबईला टक्कर देण्यासाठी २५ अब्ज डॉलरचा प्लॅन आखला आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






