UN मध्ये जयशंकर कडाडले! मानवाधिकाराच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांना फटकारले; दहशतवादावर प्रहार (फोटो सजन्य: सोशल मीडिया)
एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत दहशतवादावर बोलताना म्हटले की, दहशतवाद हा मानवाधिकारांचा सर्वात मोठा शत्रू आहे. दहशतवादामुळे निरापराध लोकांच्या जीवनाचा, त्यांच्या अधिकारांचा बळी जात आहे. त्यांनी दहशतवादाला कोणत्याही परिस्थिती सहन केले जाणार नाही. यासाठी त्यांनी दहशतवादाच्या झिरो टॉलरन्स कायद्यावर भर दिला.
याशिवाय जयशंकर यांनी मानवाधिकारावर दुटप्पी निकष ठेवणाऱ्यांवरही टीका केली आहे. मानावाधिकार केवळ राजकीय चर्चेचा विषय नसावा. यावर राजकीय चर्चेपलीकडे जाऊन चर्चा व्हावी असे त्यांनी म्हटले. मानवाधिकारांसाठी जयशंकर यांनी व्यापक दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन जगाला केले. तसेच त्यांनी कोणतीही समस्या वादाने, युद्धाने सोडवण्यापेक्षा शांतता चर्चेने सोडवण्यावर भारताची भूमिका स्पष्ट केले.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा वाढत चालला आहे. संयुक्त राष्ट्रच्या मानवाधिकार परिषदेत भापत सलग सातव्यांदा बहुमताने विजय झाला आहे. भारताला परिषदेत १८८ पैकी १७७ मते मिळाली आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत महत्वाची मानली जात आहे. भारत जगात एक सेतू म्हणून भूमिका बजावण्यास तयार असल्याचे जयशंकर यांनी म्हटले.
एस. जयशंकर यांनी भारताच्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या विकासाचा उल्लेख करताना म्हटले की, भारताच्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमुळे सार्वजनिक पायाभूमित सुविधा पारदर्शकपणे थेट लाखो लोकांपर्यंत पोहचल्या आहे. तंत्रज्ञानाचा वापर मानवी हक्कांसाठी फोर्स मल्टीप्लायर ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच डिजिटल विकासामुळे सार्वजनिक योजनांमध्ये भ्रष्टाचार कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
जयशंकर यांनी जागतिक दक्षिणेती देशांच्या विकासावर भर दिला. तसेच यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले. भारताने विकसनशील देशांमध्ये गरिबी आणि बाह्य संकटातूनही लोकशाही आणि न्यायपूर्ण विकासाला तालना दिल्याचे म्हटले. तसेच जागतिक स्तरावर शांतता आणि सहकार्याचा संदेश दिले.
भारताची मोठी चाल! ‘या’ दोन आफ्रिकन देशांसोबत केला मोठा करार; पाकिस्तान-चीनचे दाबे धणाणल
Ans: एस जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र परिषदेत दहशतवादावर बोलताना म्हटले की, दहशतवाद हा मानवाधिकारांचा सर्वात मोठा शत्रू आहे. यामुळे दहशतवादाला कोणत्याही परिस्थिती सहन केले जाणार नाही असे त्यांनी म्हटले.
Ans: जयशंकर यांनी मानवाधिकारावर दुटप्पी निकष ठेवणाऱ्यां पाश्चात्य देशांवर टीका केली. मानवाधिकारांसाठी जयशंकर यांनी व्यापक दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन जगाला केले.






