फोटो सौजन्य: Gemini
देशात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी आणि महिंद्राच्या इलेक्ट्रिक कार लोकप्रिय आहेत. मात्र, या कंपनीच्या कोणत्या कार जास्त रेंज ऑफर करतात? चला याबद्दल जाणून घेऊयात.
मारुतीची ही इलेक्ट्रिक SUV एकदा फुल चार्ज केल्यावर तब्बल 543 किमी (ARAI) पर्यंत धावण्याचा दावा करते. या कारमध्ये बॅटरी-आधारित सबस्क्रिप्शन (Battery as a Service) पर्यायही दिला आहे, त्यामुळे कार खरेदी करताना सुरुवातीचा खर्च कमी होतो. यात 49kWh आणि 61kWh असे दोन बॅटरी पर्याय मिळतात. तसेच, याची मोटर 144hp ते 174hp इतकी पॉवर निर्माण करते.
टाटा हॅरियर EV ही या यादीतील AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) असलेली एक खास SUV आहे. याच्या टॉप व्हेरिएंटमध्ये 75kWh ची मोठी बॅटरी आणि ड्युअल मोटर सेटअप दिला आहे. ही कार फक्त 6.3 सेकंदांत 0 ते 100 किमी/ताशी वेग गाठू शकते. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ती 627 किमी (ARAI) पर्यंतची रेंज देते.
टॅक्स वाढवून देखील Suzuki च्या ‘या’ Bike ला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! ठरली नंबर 1 बाईक
महिंद्राची XEV 9e ही सुरुवातीपासूनच इलेक्ट्रिक वाहन म्हणून डिझाइन करण्यात आलेली SUV आहे. यात 79kWh ची मोठी बॅटरी देण्यात आली असून, ती एकदा फुल चार्ज केल्यावर 656 किमी (ARAI) पर्यंत धावू शकते. याची मोटर 231hp ते 286hp इतकी पॉवर जनरेट करते.
महिंद्राची XEV 9S ही भारतातील पहिली 3-रो सीटिंग असलेली इलेक्ट्रिक SUV आहे. ही कार एकदा फुल चार्ज केल्यावर 679 किमी (ARAI) पर्यंत धावण्याचा दावा करते. ही रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) प्रणालीसह येते आणि तिची मोटर 231hp ते 286hp इतकी शक्ती निर्माण करते.
महिंद्राची BE 6 ही एकदा फुल चार्ज केल्यावर 683 किमी (ARAI) पर्यंत धावण्याचा दावा करणारी SUV आहे, जी भारतातील इलेक्ट्रिक SUV सेगमेंटमध्ये सर्वाधिक रेंज देणारी मानली जाते. यातही RWD सिस्टम देण्यात आली असून, 79kWh ची दमदार बॅटरी वापरण्यात आली आहे.






