(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
महिंद्राची स्थापना कैलाशचंद्र महिंद्रा आणि जगदीशचंद्र महिंद्रा यांनी केली. गुलाम मोहम्मद हे आणखी एक भागीदार होते. त्यांच्या नावामुळे कंपनीचे पूर्ण नाव ‘महिंद्रा अँड मोहम्मद’ असे होते. १९४७ च्या फाळणीनंतर, महिंद्रा भारतातच राहिले, पण मोहम्मद पाकिस्तानात गेले आणि त्यामुळे कंपनीच्या नावातील दुसऱ्या ‘M’ या अक्षराचा अर्थही बदलला. एकेकाळी ‘महिंद्रा अँड मोहम्मद’ म्हणून ओळखली जाणारी ही कंपनी आता ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ झाली आहे. या घटनेवरून स्वातंत्र्यावेळी झालेल्या फाळणीने फक्त एका देशाचेच दोन भागांत विभाजन केले नाही, तर एका कंपनीचेही विभाजन केले.
महिंद्राची सुरुवात एक स्टील ट्रेडिंग कंपनी म्हणून झाली. १९४५ मध्ये, पंजाबमधील लुधियाना येथील कैलाशचंद्र महिंद्रा आणि जगदीशचंद्र महिंद्रा या दोन भावांनी कंपनीची सुरुवात केली. गुलाम मोहम्मद हे त्यांचे भागीदार होते. याचा अर्थ असा की, कंपनीची स्थापना तीन लोकांनी मिळून केली होती आणि तिचे नाव ‘महिंद्रा अँड मोहम्मद’ असे ठेवण्यात आले होते. आपल्या भागीदाराला समान भागीदार वाटावे म्हणून महिंद्रा बंधूंनी कंपनीच्या नावात मोहम्मद यांचा समावेश केला होता. पण कंपनीतील महिंद्रा यांचा वाटा त्या भावांच्या वाट्यापेक्षा कमी होता.
१९४७ ची फाळणी कोण विसरू शकणार नाही. ज्या फाळणीने हजारो निष्पाप जीवांचा मोबदला मागितला तिच ही घटना. या फाळणीने भारताला पाकिस्तान या दुसऱ्या देशात विभागले. यानंतर गुलाम मोहम्मद पाकिस्तानला गेले आणि देशाचे पहिले अर्थमंत्री बनले. १९५१ मध्ये गुलाम मोहम्मद यांना गव्हर्नर जनरलही बनवण्यात आले, पण त्यांच्या जाण्याने महिंद्रा कंपनीचा एक भागीदारही निघून गेला. अशा कठीण काळात कंपनीला आपले नाव आणि ब्रँड टिकवून ठेवण्याचे आव्हानही पेलावे लागले. कंपनीचे नाव बदलणे महिंद्रा बंधूंसाठी सोपे नव्हते आणि मग त्यांनी दुसऱ्या ‘M’ चा अर्थ मोहम्मदवरून बदलून महिंद्रा असा केला.
आनंद महिंद्रा यांनी त्यांना आलेल्या आव्हानाबद्दल बरंच सांगितले. हे सांगत ते म्हणाले की जेव्हा गुलाम मोहम्मद यांनी कंपनी सोडली, तेव्हा कंपनीच्या बहुतेक कागदपत्रांवर आधीच ‘एम अँड एम’ (M&M) असे लिहिलेले होते. हे सर्व साहित्य वाया जाऊ नये आणि कंपनीचे नाव बदलण्याचा त्रास टाळण्यासाठी, तो शब्द तसाच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि पूर्ण नाव बदलून ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ असे ठेवण्यात आले. अशा प्रकारे, ‘एम अँड एम’ (M&M) हे नाव अबाधित राहिले आणि हा ब्रँड याच नावाने पुढे चालू राहिला. जरी या फाटाफुटीमुळे दोन भागीदार वेगळे झाले असले, तरी गुलाम मोहम्मद यांचे महिंद्रा परिवारासोबतचे वैयक्तिक संबंध अबाधित राहिले. १९५५ मध्ये भारतात आल्यावर, त्यांनी सर्वप्रथम महिंद्रा परिवाराशी संपर्क साधला.






