(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
बोर्ड परीक्षा होऊन एक महिना उलटल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालक SSC आणि HSC परीक्षा २०२६ च्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यावर्षी १० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षा घेतल्या होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र इयत्ता १२वीचा निकाल २०२६ मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे, तर इयत्ता १०वीचा निकाल एचएससी निकालानंतर दोन आठवड्यांनी, म्हणजेच मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. पण याबाबत, एमएसबीएसएचएससी (MSBSHSE) कडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही.
परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या १४ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे, १२वीचा निकाल पुढील १५ ते २० दिवसांत जाहीर होऊ शकतो. तसेच, १०वीच्या बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल. निकाल तपासण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, सर्वप्रथम एचएससीचा निकाल जाहीर केला जाईल आणि त्यानंतर एसएससीचा निकाल ssc.gov.in किंवा mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केला जाईल.






